शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

अवघी हयात सरली आमची... तरी बी कुणाचं लक्ष जाईना!

By admin | Updated: April 30, 2017 05:03 IST

पिढ्या मागून पिढ्या सरल्या, अनेकांची हयात पणाला लागली. कुणी जन्मल्या नंतर गेले, कुणी जन्मायच्या आधिच. दळणवळणाची सुविधाच नसल्याने मृत्युनंतरही

- कांताराम भवारी,  डिंभे

पिढ्या मागून पिढ्या सरल्या, अनेकांची हयात पणाला लागली. कुणी जन्मल्या नंतर गेले, कुणी जन्मायच्या आधिच. दळणवळणाची सुविधाच नसल्याने मृत्युनंतरही अनेकदा डोंगराच्या पायथ्याशीच अंतिम कार्य उरकावे लागले. कित्येक माय बहीणींना त्यांच्या अडचणीच्या काळात दवाखान्याच्या सुविधा मिळाल्या नाहीत. आजा-याला झोळीचा तर बाळंतीणीला सुयिनीचा आधार. पाणी, विज,आरोग्य टंचाई तर यांच्या पाचविलाच पुजलेली जगण्यासाठी येथील आदिवासींना तर दररोजच झगडावे लागते. स्वातंत्र्यपुर्व काळापासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात उंच डोंगरावर वसलेले आपटी हे गांव मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहीले असून मुलभूत सुविधांची वाट पहाण्यात आजवर आपटी ग्रामस्थांच्या पिढ्यामागून पिढ्या पणाला लागल्या आहेत.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगर माथ्यावर वसलेले आपटी हे एक आदिवासी गांव, स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली तरीही हे गांव मुलभूत सुविधांपासून वंचित राहीले आहे.गावातील पाण्याची गरज भागविण्यासाठी गावकऱ्यांनी दोन विहीरी बांधल्या आहेत. मात्र या जिर्ण विहीरींची वर्षानुवर्षे डागडूजीची कामे न झाल्याने कठडे तुटलेल्या या विहीरी धोकादायक झाल्या आहेत. विहीरीच्या दगडावर एक पाय आत व एक पाय बाहेर ठेवून येथील महीला पाणी ओढत असल्याचे भयान चित्र येथे पहावयास मिळाले. या विहीरी पैकी गावाच्या खालच्या बाजूला आसणा-या विहीरीचा वापर गावकरी वापरण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी करतात. सध्या या विहीरतील पाणी तळाला गेले असून ते पिवळे झाल्याने पावरण्यायोग्य राहीले नाही. गावाच्या उजव्या हाताला असणाऱ्या विहीरीवरच गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची भीस्त आहे. गावातील सुमारे ६० ते ७० कुटुंबांना याच विहीरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.ना रस्ता ना पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधांची वाणवा, चौथी नंतरच्या शिक्षणासाठी गाव सोडून डोंगरावरून दररोज करावी लागणारी पायपीट तर दैनंदिन व्यवहारा बरोबरच, मोलमजूरी, दवापाणी, बाजारहाट व दुध विक्रीसाठी दररोज छताडावरील भला मोठा डोंगराची चढण-उतरण करण्याची वेळ आल्याने येथील आदिवासीनी निसर्गापुढे हार मानली आहे. अनेकदा बाळंत पणाच्या काळात मायबहीणींना झोळीत घालून रात्र अपरात्री डोंगर उतरावा लागतो. आजारी, जेष्ट नागरीकांचीही हीच त-हा. मात्र कोणतीही तक्रार न करता नशिबी आलेल जगायचं. अशीच येथील गावकऱ्यांच्या अंगवळणी पडल असून मुलभूत सुविधा अभावी आपटीकरांना पिढ्यान पिढ्यापासून खडतर जिवन कंठण्याची वेळ आली आहे. वारंवार मागण्या-निवेदने दिल्या नंतर अता कुठेतरी आपटीच्या रस्त्याला मंजूरी मिळाल्याचे समजते. गेल्या वर्षे भरापासून ही चर्चा आसल्याने आपटीकरांना अता रस्ता मिळेण्याची स्वप्न पडू लागली आहेत. परंतु अद्याप तरी या रस्त्याचे काम प्रत्येक्षात सुरू झाले नाही. मूलभूत सुविधा नसल्योन या गावात राहणारे गावकरी त्रस्त झाले असून निसर्गापुढे त्यांना हार मानन्याची वेळ आली आहे. दळणवळणासाठी कोणतीच सुविधा नसल्याने प्रशासणाच्या नजरेतूनही या गावाकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्ताच नसल्याने आजही येथील गावकरी एक प्रकारे अज्ञात वासात रहात आहे. पिढ्या मागून पिढ्या सरल्या मात्र रस्तासाठी अजूनही येथील गावकऱ्यांना प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. गावाला जाण्यासाठी रस्ता तर नाहीच. त्या पाठोपाठ आपटीकरांना उन्हाळ्यामध्ये तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. दळणवळणाची कोणतीच सुविधा नसल्याने येथे टँकरने पाणी देणे शक्य नाही. पारंपरिक पाणीसाठे संपुष्ठात आले असून विहीरील झऱ्याचे पाणी टीपून आळीपाळीने हंडे भरण्याची वेळ येथील महीलांवर आली आहे. पाण्यासाठी आपटीकरांचा जिव कासाविस होत आहे. पाण्यासाठी येथील महीलांचा दिवस अन् रात्र खर्ची होत आहे. दररोज पाणी अणायचे तरी कोठून? पाण्यासाठी महीलांची झोप उडाली आहे.