शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

सेरेब्रल पाल्सीला झुगारून न्यायाधीशपदापर्यंत 'बाजी' मारणाऱ्या निखीलची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 17:14 IST

उत्तुंग ध्येय असणाऱ्यांच्या वाटेत कितीही काटे आले तरी कष्ट आणि सातत्याच्या जोरावर ते शिखरावर पोहोचतातच. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे पुण्यातल्या निखील बाजीची.

पुणे : उत्तुंग ध्येय असणाऱ्यांच्या वाटेत कितीही काटे आले तरी कष्ट आणि सातत्याच्या जोरावर ते शिखरावर पोहोचतातच. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे पुण्यातल्या निखील बाजीची. सेरेब्रल पाल्सीसारख्या कधी बरं न होणाऱ्या आजाराला न घाबरता त्याने न्यायाधीशपदापर्यंत मजल मारली आहे. त्याचे हे यश खचलेल्या प्रत्येकाला नवी उमेद देणारे आहे. 

निखीलचा जन्म झाल्यावर काही महिन्यांनी त्याच्या आई कांचन बाजी यांना तो कमी हालचाल करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर एकही महिन्यात त्याच्या आजाराचे निदान झाले. पण त्याही स्थितीत संतुलन न ढळू देता कुटुंबीयांनी फिजिओथेरपीचे उपचार सुरु ठेवले. आजूबाजूचे अनेक जण विविध सल्ले देत असत, आगंतुक विचारणा करत असत पण या सगळ्याकडे फार लक्ष न देता आपला मुलगा हा नॉर्मलच आहे असा विचार करत त्यांनी त्याला नॉर्मल शाळेत घालण्याचे ठरवले. अनेक शाळांनी नाकारल्यावर त्याला डॉ शामराव कलमाडी शाळेत प्रवेश मिळाला. शाळेतले सर्वसामान्य मुलांप्रमाणे मिळणारी वागणूक बघून त्याची जडणघडण होत होती.अगदी इतर मित्रांप्रमाणे दोन चाकी नसली चार चाकीसायकलवरून तो शाळेत जायचा. दहावीला ७८ तर बारावीला ७९ टक्के इतके घसघशीत यश त्याने संपादन केले. त्यानंतर त्याने  गुजरात येथील गांधीनगरमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्या देशभर होणाऱ्या प्रवेश परीक्षेत तो निवडला गेला होता. घरापासून पाच वर्ष लांब राहून त्याने स्वतःच्या बळावर पदवी मिळवली. 

मात्र पदवी मिळाल्यावर नोकरी मिळवताना त्याला अनेकदा अपयश आले. त्याच्या शारीरिक स्थितीमुळे अनेक नामांकित फर्मने त्याला नकार कळवला. अखेर रौनक शहा यांच्याकडे त्याने कामाला सुरुवात केली.  वकिली क्षेत्रातील धावपळ जपत त्याने ५ वर्ष पुण्यात प्रॅक्टिस केली आणि त्याला न्यायाधीश होण्याच्या इच्छेनं अक्षरशः झपाटले. दररोज काही तास तो अभ्यास करत होता. आजही निखीलला वेगाने लिहिता येत नाही. पेपर लिहिण्यासाठी त्याला मदतनीस लागतो. या परीक्षेत तर दिवसातून दोन पेपर असतात पण अमित देवस्थळे या मित्राच्या साहाय्याने त्याने ८ तास पेपर लिहिला आणि त्याची न्यायाधीशपदी निवड झाली. 

 हा संपूर्ण प्रवास सोपा कधीच नव्हता. अनेक अडचणी आल्या, काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या पण कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने निखील त्यातूनही बाहेर पडला. अनेक जण तोंडावर आजाराविषयी विचारायचे, काहीजण खोचक सवाल करायचे पण सगळ्यांकडे दुर्लक्ष करून त्याने इथंवर वाटचाल केली आहे. याबाबत तो सांगतो की, 'सामान्य वातावरणात वाढ होणे मला खूप उपयोगी ठरले. माझा मोठा भाऊ सुनील याचीही यात खूप मदत झाली. जर योग्य वयात निदान झाले आणि योग्य उपचार मिळाले तर आजार आटोक्यात राहू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुटुंब, मित्र परिवार आणि समाजाची साथ असेल तर कोणीही दिव्यांग व्यक्ती स्वतःला कमजोर समजणार नाही'. निखीलचा हा संघर्ष प्रेरणादायी तर आहेच पण प्रत्येक खचलेल्या व्यक्तीला नवी उमेद देणाराआहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीStudentविद्यार्थीexamपरीक्षाCourtन्यायालय