शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सेरेब्रल पाल्सीला झुगारून न्यायाधीशपदापर्यंत 'बाजी' मारणाऱ्या निखीलची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 17:14 IST

उत्तुंग ध्येय असणाऱ्यांच्या वाटेत कितीही काटे आले तरी कष्ट आणि सातत्याच्या जोरावर ते शिखरावर पोहोचतातच. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे पुण्यातल्या निखील बाजीची.

पुणे : उत्तुंग ध्येय असणाऱ्यांच्या वाटेत कितीही काटे आले तरी कष्ट आणि सातत्याच्या जोरावर ते शिखरावर पोहोचतातच. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे पुण्यातल्या निखील बाजीची. सेरेब्रल पाल्सीसारख्या कधी बरं न होणाऱ्या आजाराला न घाबरता त्याने न्यायाधीशपदापर्यंत मजल मारली आहे. त्याचे हे यश खचलेल्या प्रत्येकाला नवी उमेद देणारे आहे. 

निखीलचा जन्म झाल्यावर काही महिन्यांनी त्याच्या आई कांचन बाजी यांना तो कमी हालचाल करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर एकही महिन्यात त्याच्या आजाराचे निदान झाले. पण त्याही स्थितीत संतुलन न ढळू देता कुटुंबीयांनी फिजिओथेरपीचे उपचार सुरु ठेवले. आजूबाजूचे अनेक जण विविध सल्ले देत असत, आगंतुक विचारणा करत असत पण या सगळ्याकडे फार लक्ष न देता आपला मुलगा हा नॉर्मलच आहे असा विचार करत त्यांनी त्याला नॉर्मल शाळेत घालण्याचे ठरवले. अनेक शाळांनी नाकारल्यावर त्याला डॉ शामराव कलमाडी शाळेत प्रवेश मिळाला. शाळेतले सर्वसामान्य मुलांप्रमाणे मिळणारी वागणूक बघून त्याची जडणघडण होत होती.अगदी इतर मित्रांप्रमाणे दोन चाकी नसली चार चाकीसायकलवरून तो शाळेत जायचा. दहावीला ७८ तर बारावीला ७९ टक्के इतके घसघशीत यश त्याने संपादन केले. त्यानंतर त्याने  गुजरात येथील गांधीनगरमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्या देशभर होणाऱ्या प्रवेश परीक्षेत तो निवडला गेला होता. घरापासून पाच वर्ष लांब राहून त्याने स्वतःच्या बळावर पदवी मिळवली. 

मात्र पदवी मिळाल्यावर नोकरी मिळवताना त्याला अनेकदा अपयश आले. त्याच्या शारीरिक स्थितीमुळे अनेक नामांकित फर्मने त्याला नकार कळवला. अखेर रौनक शहा यांच्याकडे त्याने कामाला सुरुवात केली.  वकिली क्षेत्रातील धावपळ जपत त्याने ५ वर्ष पुण्यात प्रॅक्टिस केली आणि त्याला न्यायाधीश होण्याच्या इच्छेनं अक्षरशः झपाटले. दररोज काही तास तो अभ्यास करत होता. आजही निखीलला वेगाने लिहिता येत नाही. पेपर लिहिण्यासाठी त्याला मदतनीस लागतो. या परीक्षेत तर दिवसातून दोन पेपर असतात पण अमित देवस्थळे या मित्राच्या साहाय्याने त्याने ८ तास पेपर लिहिला आणि त्याची न्यायाधीशपदी निवड झाली. 

 हा संपूर्ण प्रवास सोपा कधीच नव्हता. अनेक अडचणी आल्या, काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या पण कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने निखील त्यातूनही बाहेर पडला. अनेक जण तोंडावर आजाराविषयी विचारायचे, काहीजण खोचक सवाल करायचे पण सगळ्यांकडे दुर्लक्ष करून त्याने इथंवर वाटचाल केली आहे. याबाबत तो सांगतो की, 'सामान्य वातावरणात वाढ होणे मला खूप उपयोगी ठरले. माझा मोठा भाऊ सुनील याचीही यात खूप मदत झाली. जर योग्य वयात निदान झाले आणि योग्य उपचार मिळाले तर आजार आटोक्यात राहू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुटुंब, मित्र परिवार आणि समाजाची साथ असेल तर कोणीही दिव्यांग व्यक्ती स्वतःला कमजोर समजणार नाही'. निखीलचा हा संघर्ष प्रेरणादायी तर आहेच पण प्रत्येक खचलेल्या व्यक्तीला नवी उमेद देणाराआहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीStudentविद्यार्थीexamपरीक्षाCourtन्यायालय