शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

न्याय मागण्यासाठी पत्रकारच जवळचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:33 AM

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय मागणीसाठी पत्रकारांकडे गेले, आम्ही विरोधी पक्षातले नेतेही सरकारने बोलू दिले नाही तर पत्रकारांकडेच जातो

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय मागणीसाठी पत्रकारांकडे गेले, आम्ही विरोधी पक्षातले नेतेही सरकारने बोलू दिले नाही तर पत्रकारांकडेच जातो. त्यामुळे सामान्यांना न्याय मागण्यासाठी आजही पत्रकार जवळचे वाटतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ‘दर्पण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या पुरस्काराचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. या वेळी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर, कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले आणि महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष ‘लोकमत’चे मुंबईतील विशेष प्रतिनिधी यदू जोशी, ज्येष्ठ स्तंभलेखक भाऊ तोरसेकर (मुंबई), दैनिक नवशक्तीचे (मुंबई) संपादक सुकृत खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार व जलनितीतज्ज्ञ सुधीर भोंगळे यांना ‘दर्पण जीवनसन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.‘सत्यमेव जयते’चा खरा अर्थ पत्रकारितेने दाखवला. गौरी लंकेश यांच्यासारख्या पत्रकाराची हत्या होते. याबद्दल आनंद व्यक्त करणारा वर्ग देशात आहे, याबद्दल जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली. ‘रिपोर्टर विदाऊट बॉर्डर’ या संस्थेचा दाखला देत पत्रकारांना सर्वाधिक धोका मोदींच्या राष्ट्रवादी धोरणाचा आहे. प्रेस फ्रीडममध्ये भारत १३६ व्या क्रमांकावर पॅलेस्टाईन आणि अफगाणिस्तान आपल्या पुढे आहेत. मोदी सरकार आल्यापासून ५४ हल्ले पत्रकारांवर झाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील