शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"मला बाहेर बोलायचीच चोरी झालीये"; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 18:37 IST

जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाची मागील तीन-चार दिवसांपासून चर्चा होत आहे. पक्षांतराच्या अनुषंगाने होत असलेल्या चर्चेवर त्यांनी आज पडदा टाकला. 

शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे आझाद मैदानात आंदोलन सुरू असून, या आंदोलनात बोलताना जयंत पाटलांनी एक विधान केले. राजू शेट्टींना उद्देशून केल्या गेलेल्या या विधानाचे राजकीय अर्थ काढले गेले. त्याला सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी फोडणी दिली. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चेला आणखी हवा मिळाली. पण, या सगळ्यावर स्वतः जयंत पाटलांनी पडदा टाकला. माझं काही खरं नाही, या विधानाबद्दल त्यांनी सविस्तर खुलासा केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जयंत पाटील यांनी आज काही लोकांसोबत शरद पवारांची भेट घेतली. बारामती येथे माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. नाराज असल्याच्या चर्चांबद्दल पाटील म्हणाले, "नाराजी वगैरे काही नाहीये. कसं आहे की माझी बोलायचीच चोरी झाली आहे. मी भाषण केलेलं, त्याचा संदर्भ तुम्ही काढून बघा. शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला, त्यांच्यासमोर भाषण केलं."

जयंंत पाटील 'माझं काही खरं नाही' का म्हणाले?

"मी त्यांना सांगितलं की, कालांतराने मोबदला वाढून मिळालं की, नुकसानभरपाई घेतात आणि गप्प बसतात. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का? तुम्ही ठाम आहात का? तुम्ही शेवटपर्यंत नेणार आहात का? राजू शेट्टी हा झेंडा हातात घेतलाय म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही. तो विनोदाचा भाग होता की, राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही. आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका. खरं धरू नका. तुमचं आंदोलन सुरू ठेवा, त्याला आमचा पाठींबा आहे, अशी ते बोलण्याची भावना होती", असा भूमिका जयंत पाटलांनी 'माझं काही खरं नाही', या विधानाबद्दल मांडली. 

मला कुठेतरी ढकलायचंच ठरवलेलं दिसतंय

"मी नाराज आहे पासून ते पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली. याचं स्पष्टीकरण आझाद मैदानातून विधान भवनात आल्यावर दिलं होतं. सगळ्या प्रसार माध्यमांनी ठरवलेलं दिसतंय की, मला काही करून कुठेतरी", असे मिश्कील विधानही पाटलांनी याबद्दल बोलताना केलं. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीBJPभाजपाSharad Pawarशरद पवार