शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Pune: कात्रजच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जनता दरबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 12:55 IST

कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष नमेश बाबर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली...

पुणे :पुणे महापालिकेत १९९७ साली कात्रज गावाचा समावेश होऊनही ते अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी कात्रज विकास आघाडीच्या वतीने दि. ८ जून रोजी सांयकाळी ५ वाजता कात्रज भाजीमंडई येथे आमदार, खासदार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन केले आहे.

कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष नमेश बाबर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या जनता दरबाराला खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे , आमदार चेतन तुपे, संजय जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार योगेश टीळेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह वरिष्ठ लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कात्रजची सर्वांत मोठी समस्या वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघात आहे. आतापर्यंत याठिकाणी अनेकांचा अपघाती मृत्यू झाला असून, जायबंदी झालेल्यांची संख्या हजारांमध्ये आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या वतीने वंडरसिटी ते राजस सोसायटी चौकादरम्यान बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे नियोजन चुकले असून, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. भविष्यातील मेट्रोचा विचार न करताच या पुलाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्याऐवजी वंडरसिटी ते खडीमशीन चौकापर्यंत उड्डाणपूल बांधल्यास भूसंपादनासाठी आवश्यक असलेला सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधी वाचणार असून, अवजड वाहनांनादेखील निर्धोक प्रवास करता येणार आहे, असेही नमेश बाबर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रज