शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जनाई-शिरसाई पाणीप्रश्न पेटला, उंडवडीत शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 01:07 IST

बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून हक्काचे पाणी सोडावे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तिस-या दिवशी बहुसंख्य महिलावर्ग आणि शेळ्या-मेंढ्यांसह आंदोलन केले.

सुपे : बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून हक्काचे पाणी सोडावे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तिस-या दिवशी बहुसंख्य महिलावर्ग आणि शेळ्या-मेंढ्यांसह आंदोलन केले. जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली.गुरुवारपासून बारामती-पाटस रस्त्यावरील बस स्थानकाजवळ जनाई-शिरसाईचे पाणी सोडण्यासंदर्भात चक्री उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. या वेळी शेतक-यांनी जागरण-गोंधळ घालून चक्री उपोषण केले. शनिवारी तिसºया दिवशी महिलांसह शेळ्यामेंढ्या उपोषण स्थळी आणल्या होत्या.दरम्यान, या योजनेचे कार्यकारी अभियंता महेश कानेटकर, उपअभियंता ए. एल. राऊत यांनी शुक्रवारी शेतकºयांशी संवाद साधला. मात्र, चर्चा निष्फळ ठरली. तर, शनिवारी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट दिली. मात्र, शेतक-यांशी संवाद न साधताच ते निघून गेल्याने उपोषणकर्ते चिडले असल्याने उपोषण तीव्र होण्याचे संकेत आहेत.या शेतक-यांना पाठिंबा देण्यासाठी उंडवडी क.प., जराडवाडी, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, नारोळी, कोळोली, देऊळगाव रसाळ, सुपे, गोजुबावी, कारखेल, साबळेवाडी, अंजनगाव, बºहाणपूर, काळखैरेवाडी आदी गावांतील शेतकºयांनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिल्याची माहिती उंडवडी कडेपठारचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी दिली.पाण्याच्या नियोजनाची मागणी...बारामतीच्या जिरायती पट्ट्यात यंदा पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर या भागाला वरदान ठरत असलेल्या जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून लाभपट्ट्यात हक्काचे पाणी सोडून कायमस्वरूपी नियोजित आवर्तन द्यावेत, अशी मागणी शेतकºयांची आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी