शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

आला पावसाळा, पोट सांभाळा, आहाराचे नियम पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:08 IST

पुणे : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हॉटेलमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत बसण्यास, तर रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी ...

पुणे : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हॉटेलमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत बसण्यास, तर रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनेक महिने घरचे अन्न खाऊन आलेला कंटाळा झटकण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हॉटेलमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सातत्याने बाहेरचे मसालेदार, चमचमीत पदार्थ खाल्ल्यास पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आहाराचे नियम पाळण्याच्या सूचना डॉक्टरांकडून दिल्या जात आहेत.

पावसाळ्यात तेलकट, तूपकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक तक्रारी सुरू होतात. अपचन होणे, अ‍ॅसिडिटी वाढणे, जुलाब होणे, अतिसार यामुळे तब्येत बिघडते. पचनसंस्थेवर ताणही निर्माण होतो, आतड्याशी संबंधित विकार वाढतात. पित्ताशयात खडे होणे, बद्धकोष्ठता, पोटदुखी असे त्रास पावसाळयातच डोके वर काढतात. हॉटेलमधील चमचमीत पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जातात आणि वजन वाढण्याची शक्यताही निर्माण होते. या दिवसांमध्ये शरीरात वाताचा प्रकोप वाढलेला असतो, त्यामुळे पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे पावसाळ्यात पोट सांभाळावे, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-------------------

पावसाळ्यात हे खायला हवे

* पावसाळ्यात घरी बनवलेले ताजे पदार्थ खावेत.

* उकडलेले, उकळलेले, भाजलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

* पचायला हलके पदार्थ खाल्ल्याने पोटविकार उद्भवण्याची शक्यता कमी होते.

* भरपूर पाणी पिण्याची सवय पावसाळ्यातही कायम ठेवावी.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

* उघड्यावरचे आणि शिळे पदार्थ खाऊ नयेत.

* चाट, वडे, भजी अशा पदार्थांमुळे पोट हमखास बिघडते.

* बाहेरचे फळांचे ज्यूस टाळावे.

* मसालेदार, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत.

---------------------

पावसाळ्यासाठी वात आणि पित्त हे दोन्ही दोष वाढतात. जठराग्नी मंद होतो, भूक कमी लागते. या अनुषंगाने आहार आणि विहार यांचे तारतम्य बाळगल्यास पोटाचे आजार होणार नाहीत. वात वाढू नये म्हणून थंड, आंबवलेले पदार्थ टाळावे. उबदार कपडे वापरावे. जेवताना कोमट पाणी प्यावे. वांगी, बटाटा, वाटाणा यासारख्या भाज्या टाळाव्यात. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, त्यांनी पालेभाज्यांचे नियमित सेवन टाळावे. कारण आयुर्वेदानुसार पावसाळ्यात पाण्यामध्ये आम्लता वाढते. ओवा आणि बडीशेप समप्रमाणात थोडे भाजून चूर्ण करून ठेवावे. जेवणानंतर दोन्ही वेळा अर्धा चमचा खावे. जेवणात गरम सूप असावे. ज्वारीची भाकरी एका जेवणात असावी.

- डॉ. प्रसाद बापट, आयुर्वेदतज्ज्ञ

-------------------

हॉटेलमध्ये गेल्यावर पावसाळ्यात शक्यतो कच्चे पदार्थ खाऊ नयेत. कच्च्या भाज्यांचे पदार्थ बनवताना, हाताळताना जीव-जीवाणू वाढण्याची शक्यता असते. गरम, शिजवलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा. उदा: सँडविच खाण्याऐवजी इडली, डोसा असे पदार्थ खावेत. हॉटेलमध्ये शिळे घटक पदार्थ वापरले जात असतील तर त्रास होऊ शकतो. गाडीवरचे वडे, भजी वारंवार एकाच तेलात तळले जातात, त्यामुळे पोटाला त्रास होतो. पदार्थ घरी पार्सल आणताना प्रिटेंड कागद वापरला जात असेल, तर त्यावरची शाई पदार्थात उतरू शकते. त्यामुळे शक्यतो घरचा डबा घेऊन पार्सल आणायला जावे किंवा चांगला कागद वापरला आहे की नाही, ते पाहावे.

- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

---------------------