शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
2
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
3
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
4
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
5
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
6
पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार
7
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
8
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
9
‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला
10
Hot Chocolate Recipe: वजन वाढण्याची चिंता सोडा! 'गिल्ट-फ्री' राहून पौष्टिक हॉट चॉकलेटचा घरीच आस्वाद घ्या 
11
VIDEO: आजोबांच्या धाडसाला सलाम! ८० वर्षांच्या 'तरूणा'चे १५००० फूट उंचीवरून 'स्कायडायव्हिंग'
12
एक विवाह ऐसा भी! नवरदेवाने हुंड्याचे ७ लाख केले परत; म्हणाला, "आम्हाला फक्त १ रुपया अन्..."
13
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
14
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
15
महायुतीत नाराजीचा स्फोट, शिंदे गटातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव, तर उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला 
16
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
17
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
18
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
19
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
20
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आला पावसाळा, पोट सांभाळा, आहाराचे नियम पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:08 IST

पुणे : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हॉटेलमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत बसण्यास, तर रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी ...

पुणे : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हॉटेलमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत बसण्यास, तर रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनेक महिने घरचे अन्न खाऊन आलेला कंटाळा झटकण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हॉटेलमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सातत्याने बाहेरचे मसालेदार, चमचमीत पदार्थ खाल्ल्यास पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आहाराचे नियम पाळण्याच्या सूचना डॉक्टरांकडून दिल्या जात आहेत.

पावसाळ्यात तेलकट, तूपकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक तक्रारी सुरू होतात. अपचन होणे, अ‍ॅसिडिटी वाढणे, जुलाब होणे, अतिसार यामुळे तब्येत बिघडते. पचनसंस्थेवर ताणही निर्माण होतो, आतड्याशी संबंधित विकार वाढतात. पित्ताशयात खडे होणे, बद्धकोष्ठता, पोटदुखी असे त्रास पावसाळयातच डोके वर काढतात. हॉटेलमधील चमचमीत पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जातात आणि वजन वाढण्याची शक्यताही निर्माण होते. या दिवसांमध्ये शरीरात वाताचा प्रकोप वाढलेला असतो, त्यामुळे पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे पावसाळ्यात पोट सांभाळावे, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-------------------

पावसाळ्यात हे खायला हवे

* पावसाळ्यात घरी बनवलेले ताजे पदार्थ खावेत.

* उकडलेले, उकळलेले, भाजलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

* पचायला हलके पदार्थ खाल्ल्याने पोटविकार उद्भवण्याची शक्यता कमी होते.

* भरपूर पाणी पिण्याची सवय पावसाळ्यातही कायम ठेवावी.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

* उघड्यावरचे आणि शिळे पदार्थ खाऊ नयेत.

* चाट, वडे, भजी अशा पदार्थांमुळे पोट हमखास बिघडते.

* बाहेरचे फळांचे ज्यूस टाळावे.

* मसालेदार, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत.

---------------------

पावसाळ्यासाठी वात आणि पित्त हे दोन्ही दोष वाढतात. जठराग्नी मंद होतो, भूक कमी लागते. या अनुषंगाने आहार आणि विहार यांचे तारतम्य बाळगल्यास पोटाचे आजार होणार नाहीत. वात वाढू नये म्हणून थंड, आंबवलेले पदार्थ टाळावे. उबदार कपडे वापरावे. जेवताना कोमट पाणी प्यावे. वांगी, बटाटा, वाटाणा यासारख्या भाज्या टाळाव्यात. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, त्यांनी पालेभाज्यांचे नियमित सेवन टाळावे. कारण आयुर्वेदानुसार पावसाळ्यात पाण्यामध्ये आम्लता वाढते. ओवा आणि बडीशेप समप्रमाणात थोडे भाजून चूर्ण करून ठेवावे. जेवणानंतर दोन्ही वेळा अर्धा चमचा खावे. जेवणात गरम सूप असावे. ज्वारीची भाकरी एका जेवणात असावी.

- डॉ. प्रसाद बापट, आयुर्वेदतज्ज्ञ

-------------------

हॉटेलमध्ये गेल्यावर पावसाळ्यात शक्यतो कच्चे पदार्थ खाऊ नयेत. कच्च्या भाज्यांचे पदार्थ बनवताना, हाताळताना जीव-जीवाणू वाढण्याची शक्यता असते. गरम, शिजवलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा. उदा: सँडविच खाण्याऐवजी इडली, डोसा असे पदार्थ खावेत. हॉटेलमध्ये शिळे घटक पदार्थ वापरले जात असतील तर त्रास होऊ शकतो. गाडीवरचे वडे, भजी वारंवार एकाच तेलात तळले जातात, त्यामुळे पोटाला त्रास होतो. पदार्थ घरी पार्सल आणताना प्रिटेंड कागद वापरला जात असेल, तर त्यावरची शाई पदार्थात उतरू शकते. त्यामुळे शक्यतो घरचा डबा घेऊन पार्सल आणायला जावे किंवा चांगला कागद वापरला आहे की नाही, ते पाहावे.

- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

---------------------