शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

दहावी - बारावीत क्रीडा गुण मिळवणे होणार कठीण : शिक्षण विभागाने बदलला नियम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 20:59 IST

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या  क्रीडा गुणांच्या सवलतीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) काही बदल करण्यात आले आहेत.

पुणे : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या  क्रीडा गुणांच्या सवलतीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत विविध खेळप्रकारांमध्ये मिळवलेल्या प्राविण्याचा विचार होणार आहे, मात्र त्यांनी इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये त्या खेळप्रकारामध्ये सहभाग घेतला असणे आवश्यक असणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.           दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रविष्ठ होणारे खेळाडू विद्यार्थी तसेच एनसीसी, स्काऊट गाइडमधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दती राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेल्या ११ खेळप्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेले असल्यास त्याचाच विचार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी इयत्ता ६ वी ते १० पर्यंत जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला असल्यास शासनाच्या परिशिष्ट ६ मधील तरतुदीनुसार त्या विद्यार्थ्यांना ५ ते २५ पर्यंत गुण दिले जाणार आहेत. मात्र त्यानंतर इयत्ता दहावीमध्ये असताना त्या विद्यार्थ्यांने संबंधित क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. इयत्ता १२ वीमध्ये गुणांची सवलत मिळविताना त्याने बारावीमध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.            खेळाडू कोणत्याही जिल्हयातून खेळला असला तरी विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत असेल त्या जिल्हयाच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी त्यास प्रमाणित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने एकापेक्षा अधिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले असले तरी त्याने ज्या उच्चतम असणाऱ्या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला त्या एकाच सवलतीचे गुण त्याला दिले जातील. जिल्हा क्रीडा अधिकारी  त्यांना शाळांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून ३० एप्रिल पूर्वी ते संबंधित विभागीय मंडळास शिफारशींसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणSSC Results 2018दहावी निकाल २०१८HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षा