शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Winter Session Maharashtra: राज्यात यंदा थंडी वाढणार; आता झाली हिवाळ्याची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 09:14 IST

उत्तर पश्चिम भारताच्या बहुतांश भागात तसेच ईशान्येकडील राज्यांत मात्र, थंडी कमी राहण्याची शक्यता

पुणे : यंदाच्या हिवाळ्याची सुरुवात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या लेखी गुरुवारपासून (दि. १) झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत असणाऱ्या हंगामात दक्षिणेकडील राज्यांत तसेच मध्य भारत व उत्तर पश्चिम भारताच्या काही भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्याचाच अर्थ यंदा थंडी जास्त असेल. उत्तर पश्चिम भारताच्या बहुतांश भागात तसेच ईशान्येकडील राज्यांत मात्र, थंडी कमी राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुरुवारी राज्यात पुन्हा थंडीचा प्रभाव वाढला असून सर्वांत कमी तापमान औरंगाबाद येथे १०.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुण्यातही पुन्हा थंडी वाढली असून शहरात तापमानाचा पारा ११.९ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला.

हवामान विभागाने सबंध हिवाळ्यासाठी चार महिन्यांचा अंदाज गुरुवारी जारी केला. त्यानुसार उत्तर पश्चिम, पूर्व व उत्तर पूर्व भारताचा बहुतांश भाग तसेच मध्य भारताच्या अनेक भागांत कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्ये व मध्य भारताच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे तर डिसेंबरमध्ये दक्षिणेकडील राज्यांत पडणारा पाऊसही सरासरीइतका पडण्याचा अंदाज आहे. तर देशाच्या अन्य भागांत याच महिन्यात पडणारा सरासरीपेक्षा कमी असेल.

राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान 

कोल्हापूर १६.८, महाबळेश्वर १२.८, मालेगाव १६.४, नाशिक १३, सांगली १५.२, सातारा १६.६, सोलापूर १५.१, मुंबई २२.५, अलिबाग १८.८, रत्नागिरी २०.३, डहाणू १९.६, उस्मानाबाद १५.२, परभणी १२.३, नांदेड १३., अकोला १४.२, अमरावती १३.७, बुलढाणा १४, चंद्रपूर १४.६, गोंदिया १२.४, नागपूर १३.२, वाशिम १४, वर्धा १३.८.

''थंडीचा प्रभाव शुक्रवारीही कायम राहील. त्यानंतर बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढून पुन्हा थंडी कमी होईल. कमाल तापमानही वाढेल. ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन थंडी वाढेल. - डॉ. अनुपम काश्यपी, हवामान अंदाज विभागप्रमुख''

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनSocialसामाजिकTemperatureतापमान