शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
7
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
8
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
9
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
10
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
11
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
12
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
13
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
15
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
16
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
17
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
18
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
19
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
20
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

हंगामा खडा करना मेरा काम नहीं...; अशोक धिवरे यांनी उलगडली साहित्याची परिभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:03 IST

साहित्यिकांनी दु:खाचे गाणे गायले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी लेखणीतून वाद ओढवून घेणाऱ्या साहित्यिकांना साहित्याची खरी परिभाषा उलगडून सांगितली. 

ठळक मुद्देबदलाच्या प्रक्रियेत विवेकवाद आणि विज्ञानवाद जोपासला गेला पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुखअभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे : डॉ. अभिजित वैद्य

पुणे : ‘हंगामा खडा करना मेरा काम नहीं, सूरत बदलनी चाहिए... हे साहित्यिकाचे ब्रीदवाक्य असायला हवे. दु:खाची आणि वेदनेची भाषा बोलते ते साहित्य. साहित्यिकांनी दु:खाचे गाणे गायले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी लेखणीतून वाद ओढवून घेणाऱ्या साहित्यिकांना साहित्याची खरी परिभाषा उलगडून सांगितली. निमित्त होते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मीकांत देशमुख यांच्या सत्कार समारंभाचे. राष्ट्र सेवा दलाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे उपस्थित होते. डॉ. वैद्य यांच्या हस्ते देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. खोपडे म्हणाले, एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना मराठी भाषा खरंच सक्षम आहे का? याचा विचार व्हायला हवा. आज ग्रामीण भागात इंग्रजीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. इंग्रजी ही व्यावहारिक भाषा असल्यामुळे शेतमजुरालाही आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत घालण्याचा मोह होत आहे. सत्काराला उत्तर देताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘लेखक साहित्यातून दु:खाची कहाणी सांगत असतो. प्रत्येक माणसाचे दु:ख हे वेगळे असते. प्रत्येक जाती धर्म, वंचित घटकांच्या दु:खावर भाष्य करायला हवे. मी अगदी गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर लिखाण केले आहे. माजी प्रशासकीय अधिकारी असतानाही लेखन करीत होतो. त्या लिखाणावरून अनेकदा मोर्चे निघाले, चार बदल्या झाल्या. तरीही शासनाच्या चौकटीत राहून लिखाण करण्याचे काम केले.  बदलाच्या प्रक्रियेत विवेकवाद आणि विज्ञानवाद जोपासला गेला पाहिजे.’ डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, ‘एकीकडे मानवी मूल्यांची घसरण होत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, अशा परिस्थितीत साहित्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची खरी गरज आहे.’ 

टॅग्स :Puneपुणे