शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

हंगामा खडा करना मेरा काम नहीं...; अशोक धिवरे यांनी उलगडली साहित्याची परिभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:03 IST

साहित्यिकांनी दु:खाचे गाणे गायले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी लेखणीतून वाद ओढवून घेणाऱ्या साहित्यिकांना साहित्याची खरी परिभाषा उलगडून सांगितली. 

ठळक मुद्देबदलाच्या प्रक्रियेत विवेकवाद आणि विज्ञानवाद जोपासला गेला पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुखअभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे : डॉ. अभिजित वैद्य

पुणे : ‘हंगामा खडा करना मेरा काम नहीं, सूरत बदलनी चाहिए... हे साहित्यिकाचे ब्रीदवाक्य असायला हवे. दु:खाची आणि वेदनेची भाषा बोलते ते साहित्य. साहित्यिकांनी दु:खाचे गाणे गायले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी लेखणीतून वाद ओढवून घेणाऱ्या साहित्यिकांना साहित्याची खरी परिभाषा उलगडून सांगितली. निमित्त होते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मीकांत देशमुख यांच्या सत्कार समारंभाचे. राष्ट्र सेवा दलाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे उपस्थित होते. डॉ. वैद्य यांच्या हस्ते देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. खोपडे म्हणाले, एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना मराठी भाषा खरंच सक्षम आहे का? याचा विचार व्हायला हवा. आज ग्रामीण भागात इंग्रजीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. इंग्रजी ही व्यावहारिक भाषा असल्यामुळे शेतमजुरालाही आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत घालण्याचा मोह होत आहे. सत्काराला उत्तर देताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘लेखक साहित्यातून दु:खाची कहाणी सांगत असतो. प्रत्येक माणसाचे दु:ख हे वेगळे असते. प्रत्येक जाती धर्म, वंचित घटकांच्या दु:खावर भाष्य करायला हवे. मी अगदी गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर लिखाण केले आहे. माजी प्रशासकीय अधिकारी असतानाही लेखन करीत होतो. त्या लिखाणावरून अनेकदा मोर्चे निघाले, चार बदल्या झाल्या. तरीही शासनाच्या चौकटीत राहून लिखाण करण्याचे काम केले.  बदलाच्या प्रक्रियेत विवेकवाद आणि विज्ञानवाद जोपासला गेला पाहिजे.’ डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, ‘एकीकडे मानवी मूल्यांची घसरण होत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, अशा परिस्थितीत साहित्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची खरी गरज आहे.’ 

टॅग्स :Puneपुणे