शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

वाघ्या श्वानाच्या इतिहासाचा वाद छत्रपतींच्या वंशांनी काढावा हे दुर्दैव; संजय सोनवणी यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:00 IST

छत्रपतींच्या सैन्यात कुत्र्यांचे पथक असल्याचे देखील पुरावे आहेत, गनिमी काव्याने कुत्र्याची झुंड आधी छत्रपती सोडायचे

पुणे : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच केली होती. मात्र आता या पुतळ्यावरून काही ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीसुद्धा तारखेबाबत सवाल उपस्थित केला आहे. तर हा वाद छत्रपतींच्या वंशांनी काढावा हे दुर्दैव असल्याचे मत इतिहासतज्ज्ञ संजय सोनवणी यांनी व्यक्त केले आहे. 

 

वाघ्या श्वानच्या स्मारकावरून वाद : ३१ तारखेलाच अल्टिमेटम का ? लक्ष्मण हाकेंचा संभाजी राजेंना सवाल

सोनवणी म्हणाले, अनेक ऐतिहासिक शिल्पात छत्रपती शिवरायांसोबत हा वाघ्या दिसत आहे. शिवाजी महाराजांसोबत हा श्वान नेहमी सोबत राहत होता. म्हणून याचा उल्लेख जर्मन लोकांनी देखील जपून ठेवला आहे.  १६८० मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांच्या समाधी मांडली आणि तिथं तो कुत्रा महाराजांच्या समाधीकडे पाहत आहे. असा उल्लेख १८४५ मध्ये लिहिलेल्या ग्रंथांमध्ये आहे.

 

वाद निर्माण केला जातोय हे दुर्दैव 

 छत्रपतींच्या सैन्यात कुत्र्यांचे देखील पथक होते. त्याचे देखील पुरावे आहेत. गनिमी काव्याने कुत्र्याची झुंड आधी छत्रपती सोडायचे. वाघ्या हा स्वामीनिष्ठ होता.  ईमानदार होता. इंग्रजांनी रायगड वर हल्ला केला. त्यावेळेस अनेक वास्तू नष्ट झाल्या होत्या. वाघ्याचा आताच पुतळ्याला होळकर यांनी निधी दिला होता. वाघ्या ऐतिहासिक नव्हता हा दावा खोटा आहे. पुतळाबाई यांची समाधी नाही त्या सती गेल्या. सोयरा राणींची समाधी नाही. सोयरा बाईंची हत्या झाली होती. त्यांची देखील समाधी असू शकत नाही. सईबाईंची समाधी राजगडावर आहे. त्यांच्या समाधीचा देखील उल्लेख इतिहासात कुठेच सापडत नाही. काही पुरावे लिखित तर काही वास्तूच्या स्वरूपात मिळत असतात. पावनखिंडचे युद्ध तिथे झालं का नाही झालं हा अजूनही प्रश्न आहे? वाद हा ऐतिहासिक असतो. केवळ वाद निर्माण केला जात आहे हे दुर्दैव आहे. औरंगजेब जगाच्या पाठीवर कुठेही मेला असता तरी त्याची समाधी खुलताबादला झाली असती कारण त्याची शेवटची इच्छा होती. हा वाद उकरून काढला जात आहे. आणि हा वाद छत्रपतींच्या वंशांनी काढावा हे दुर्दैव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीdogकुत्राShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराज