शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

जगाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हिंदू समाजाचे काम-मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 21:05 IST

हिंदू समाजाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हे संघाचे काम आहे. त्याच आपलेपणाच्या सुत्रात जगाला बांधणे हे हिंदू समाजाने स्वीकारलेले काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

पुणे : हिंदू समाजाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हे संघाचे काम आहे. त्याच आपलेपणाच्या सुत्रात जगाला बांधणे हे हिंदू समाजाने स्वीकारलेले काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघ समाजात सेवाभावी कामांमधून आपलेपणा निर्माण करतो असे ते म्हणाले.आयुर्वेद भास्कर प. य. तथा दादा वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिरात डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिस शिक्षणसंस्थेचे संस्थापक शां.ब. मुजुमदार, डॉ. राजीव ढेरे विनायक खडीवाले, संगीता खडीवाले व्यासपीठावर उपस्थित होते. संघाची कामकाज पद्धत, संघाचा सेवाभाव याबद्दल डॉ. भागवत यांनी विस्ताराने माहिती दिली, त्याचबरोबर वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाच्या वाचनातून त्यांच्यासारख्याच अनेक सेवाव्रतींना प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.डॉ. भागवत म्हणाले, संघाचे काम सेवाभावातून आपलेपणा निर्माण करते. तुम्ही काम सुरू करा, संघ तुमच्याबरोबर येईल अशी ही पद्धत आहे. प्राण्यांना भूक समजते, भूक भागली हेही समजते. त्यानंतर ते काही बरोबर बांधून वगैरे घेत नाहीत. मनुष्याला बुद्धी आहे. ती आपलेपणाकडे झुकली असेल तर देवरूप होते, स्वार्थाकडे झुकली तर राक्षस होते. त्याची उदाहरणे आहेत, तसेच आपलेपणातून निर्माण झालेल्या विविधांगी कामांचाही उदाहरणे आहेत. असा आपलेपणा हिंदू समाजात निर्माण करणे हे काम संघ करतो.डॉ. मुजुमदार यांनी महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ नाही अशी खंत व्यक्त केली. वैद्य खडीवाले यांच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. ग्रंथनिर्मितीसाठी लेखिका तनुजा राहणे, मुद्रक गिरीश दात्ये यांचा डॉ. भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दादा खडीवाले यांच्या कार्याविषयीच्या माहितीपटाचे सादरीकरण झाले. संगीता वैद्य खडीवाले यांनी स्वागत केले. विनायक वैद्य खडीवाले यांनी प्रास्ताविक केले. वैद्य शुभंकर कुलकर्णी धन्वंतरी स्तवन केले. स्नेहल दामले यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. ढेरे यांनी आभार व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.आयुर्वेदातील जी काही मोठी नावे आहेत त्यातली बहुतांशी महाराष्ट्रातील आहेत, मात्र महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ नाही. ते राजस्थानमध्ये आहे, नेहमीप्रमाणे ते गुजरातमध्येही आहे असे डॉ. मुजुमदार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात हे विद्यापीठ व्हावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी डॉ. मुजुमदार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMohan Bhagwatमोहन भागवत