शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

जगाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हिंदू समाजाचे काम-मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 21:05 IST

हिंदू समाजाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हे संघाचे काम आहे. त्याच आपलेपणाच्या सुत्रात जगाला बांधणे हे हिंदू समाजाने स्वीकारलेले काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

पुणे : हिंदू समाजाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हे संघाचे काम आहे. त्याच आपलेपणाच्या सुत्रात जगाला बांधणे हे हिंदू समाजाने स्वीकारलेले काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघ समाजात सेवाभावी कामांमधून आपलेपणा निर्माण करतो असे ते म्हणाले.आयुर्वेद भास्कर प. य. तथा दादा वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिरात डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिस शिक्षणसंस्थेचे संस्थापक शां.ब. मुजुमदार, डॉ. राजीव ढेरे विनायक खडीवाले, संगीता खडीवाले व्यासपीठावर उपस्थित होते. संघाची कामकाज पद्धत, संघाचा सेवाभाव याबद्दल डॉ. भागवत यांनी विस्ताराने माहिती दिली, त्याचबरोबर वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाच्या वाचनातून त्यांच्यासारख्याच अनेक सेवाव्रतींना प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.डॉ. भागवत म्हणाले, संघाचे काम सेवाभावातून आपलेपणा निर्माण करते. तुम्ही काम सुरू करा, संघ तुमच्याबरोबर येईल अशी ही पद्धत आहे. प्राण्यांना भूक समजते, भूक भागली हेही समजते. त्यानंतर ते काही बरोबर बांधून वगैरे घेत नाहीत. मनुष्याला बुद्धी आहे. ती आपलेपणाकडे झुकली असेल तर देवरूप होते, स्वार्थाकडे झुकली तर राक्षस होते. त्याची उदाहरणे आहेत, तसेच आपलेपणातून निर्माण झालेल्या विविधांगी कामांचाही उदाहरणे आहेत. असा आपलेपणा हिंदू समाजात निर्माण करणे हे काम संघ करतो.डॉ. मुजुमदार यांनी महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ नाही अशी खंत व्यक्त केली. वैद्य खडीवाले यांच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. ग्रंथनिर्मितीसाठी लेखिका तनुजा राहणे, मुद्रक गिरीश दात्ये यांचा डॉ. भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दादा खडीवाले यांच्या कार्याविषयीच्या माहितीपटाचे सादरीकरण झाले. संगीता वैद्य खडीवाले यांनी स्वागत केले. विनायक वैद्य खडीवाले यांनी प्रास्ताविक केले. वैद्य शुभंकर कुलकर्णी धन्वंतरी स्तवन केले. स्नेहल दामले यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. ढेरे यांनी आभार व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.आयुर्वेदातील जी काही मोठी नावे आहेत त्यातली बहुतांशी महाराष्ट्रातील आहेत, मात्र महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ नाही. ते राजस्थानमध्ये आहे, नेहमीप्रमाणे ते गुजरातमध्येही आहे असे डॉ. मुजुमदार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात हे विद्यापीठ व्हावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी डॉ. मुजुमदार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMohan Bhagwatमोहन भागवत