शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे ही चांगली गोष्ट - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:36 IST

राजकारण बाजूला ठेवून निर्णय प्रक्रियेतील लोकांनी एकत्रित येऊन राज्याच्या विकासासाठी काम केले पाहिजे

बारामती : सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलीच गोष्ट आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना गेले तीन महिने वारंवार विनंती करत आहे की, महाराष्ट्रातील क्राइम , शेतकरी आत्महत्या, शिक्षक आत्महत्या, महिलांवरील अत्याचार यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करा. आज राज्यात पाण्याची परिस्थिती गंभीर होत आहे. मला असे वाटते की, राजकारण बाजूला ठेवून निर्णय प्रक्रियेतील लोकांनी एकत्रित येऊन राज्याच्या विकासासाठी काम केले पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. खासदार सुप्रिया सुळे सोमवारी बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 महाराष्ट्रासाठी ठाकरे कुटुंब एकत्र आले तर हा सुवर्णक्षण असेल, त्यासाठी राज्यातील इतर राजकीय कुटुंबांनी एकत्र यावे असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. यावर खासदार सुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, याचे मी स्वागतच करते, खरंतर हे मीच सुरुवातीला बोलले आहे. दोघे ही एकत्र येत असतील तर तो सुवर्ण क्षणच असेल. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे. अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. 

उष्णता प्रचंड वाढली आहे. पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील पाण्याचा आढावा घेतला होता. १०० टक्के प्लस  भरलेले उजनी धरण आज शून्यावर आले आहे. मतदार संघात जिथे जिथे टँकरची गरज आहे. तेथे जिल्हा अधिकाऱ्यांनी एक दिवसाचाही विलंब न करता आदेश देऊन टँकरची सोय करावी. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

कांदा, दूध, सोयाबीन बाबत मी कित्येक दिवसांपासून केंद्र सरकारला बोलत आहे. मी सातत्याने केंद्र सरकारला निर्यात शुल्क सबसिडी बंद करा सांगत आहे. याचे श्रेय भगरे सर निलेश लंके यांना जाते. त्यांनी सातत्याने यावर आवाज उठवून तो ४० टक्के वरून शून्यावर आला. पवारसाहेब कृषी मंत्री असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतले जात होते. तस या सरकारला करण्यापासून कुणी रोखले आहे,असे खासदार सुळे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस