शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

निवडणुका लक्षात न ठेवलेल्याच बऱ्या : डॉ. हमीद दाभोलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 12:13 IST

गेल्या चारही निवडणुकाच्या मध्ये माझ्यासाठी मुद्दाम लक्षात राहावी अशी एकही आठवण नाही.

थोडे धाडसी विधान होईल पण अगदी प्रामाणिकपणे साांगायचे झाले, तर मी मतदान केलेल्या गेल्या चारही निवडणुकाच्या मध्ये माझ्यासाठी मुद्दाम लक्षात राहावी अशी एकही आठवण नाही. मी अजिबात निराशावादी नाही. पण माझ्या निवडणुकीशी संबंधित बहुतांश आठवणी ह्या लवकरात लवकर विसरून गेले तर बरे अशा स्वरूपाच्या आहेत.    वरील दोन्ही विधाने मी अगदी गाांभीर्याने करतो आहे. माझा असा अंदाज आहे, की माझ्यासारखा अनुभव असलेला वर्ग गेल्या दोन दशकात आपल्या देशात वाढत चालला आहे. लोकशाही आणि  निवडणूक प्रकिया ह्याचे अनन्यसाधारण महत्व वाटणाऱ्या नागरिकांना देखील येणारा हा अनुभव आपण समजून घेतला पाहिजे असे वाटते. सामान्य माणसाचे जगणे  , लोकांचे प्रश्न आणि  निवडणुकांची प्रकिया ह्यांच्या मध्ये जे तुटले पण आले आहे, त्या त्यामधून ही भावना वाढीस लागते आहे. असे मला वाटते. एका बाजूला धर्माच्या  नावावर अधर्म पसरवणारे भाजप, शिवसेना आणि  एम आय एम सारखे पक्ष दुसऱ्या बाजूला भ्रष्ट आणि  सोईनुसार धर्माचा वापर करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखे पक्ष, समाज मनाशी सांधा तुटल्याने प्रभावहीन झालेले डावे  पक्ष आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातील लोकशाही कर्त्यव्याच्या विषयी टोकाचे असंवेदनशील झालेले आपण नागरिक ह्यांच्यामधनू एक चौफेर कोंडी तयार झाली आहे. सातत्याने फारसा फरक नसलेल्या दोन वाईट पर्यायांच्या मधूनच निवड करावी लागत आहे.  गमतीचा भाग म्हणजे कोणाचीही निवड केली, तरी आरोग्य शिक्षण सार्वजनिक सेवा प्रशासन ह्यामध्ये अपवाद सोडले तर सकारात्मक बदल होताना जवळजवळ दिसत नाही. अशा वेळी निवडणुकीत मुद्दामहून आठवणीत ठेवावे असे काही घडणे अवघड नाही का? त्यातल्या त्यात आठवणीत राहिलेला भाग म्हणजे २०१३ च्या निवडणुकीत नागरिक म्हणून आपल्याला  मिळालेला  नोटाचा अधिकार. तो अजिबातच सकारात्मक नाही हे माहित असताना देखील ही कोंडी फोडण्याची काही तरी शक्यता त्या मधून निर्माण होऊ शकते असे वाटते.मतदान करणे हे लोकशाहीतील सर्वात  पवित्र कर्तव्य  आहे.  हे वाक्य अर्ध  सत्य आहे. मतदानाच्या नंतरचे जास्त पवित्र कर्तव्य  हे सजग नागरिक  म्हणून लोकशाहीच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी होणे आहे. हे आपण सोयीस्कर विसरतो. आपण मतदान केले की लोकशाही मध्ये सर्व  काही आपोआप सुरळीत चाले असे अध्यारुत धरलेले आहे. त्यामुळेच सध्याच्या निवडणुका ह्या लक्षात ठेवण्यापेक्षा लवकरात लवकर विसरून जाव्या अशा झाल्या आहेत. पक्षीय राजकारण हे जेव्हा निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही वेठीस धरते तेव्हा नागरिकांना आपल्या कार्यक्षेत्रात  दैनंदिन  जीवनात लोकशाही सक्षम व्हावी म्हणून दीर्घ काळ कार्यकरत राहावे  लागते. हे आपण आज  केले,  तर कदाचित येणाऱ्या पिढ्यांच्या लक्षात राहाव्यात अशा निवडणुका होतील. अशी लोकशाही आपण घडवू शकू असे वाटते. (शब्दांकन - अमोल अवचिते)

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक