शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 01:41 IST

दिवसेंदिवस पाणी होते कमी : पाण्यावर हिरवा, निळा तवंग; जलचर संकटात

पळसदेव : उजनी धरणातील पाण्याचे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस उजनीचे पाणी कमी होत असले, तरी या पाण्यावर हिरवा व निळा रंग दिसत आहे. त्यामुळेच उजनी च्या जलप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.उजनी धरण हे तीन जिल्ह्यांतील इंदापूर, कर्जत, दौंड, करमाळा या तालुक्यांतील लोकांची जीवनदायनी आहे. उजनीवर शेतीसह पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

इंदापूर तालुक्यात पाऊस झालाच नाही; मात्र पुणे शहर व परिसरात पाऊस झाल्याने उजनी धरणात पाणी आले. परिणामी, धरणशंभर टक्के भरले; परंतु उजनीचे पाणी दररोज कमी होत आहे. त्यामुळेच उजनीच्या जलप्रदूषणाचा अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे.सध्या या पाण्याचा रंग निळा व हिरवा दिसत आहे. उजनीच्या जलप्रदूषणाचा विषय सोलापूर विद्यापीठात चर्चिला गेला आहे. येथील प्राध्यापकांनी उजनीचे पाणी पिण्यासाठी सोडाच, तर हात धुण्यासाठीसुद्धा योग्य नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उजनीलगत असणाऱ्या गावांमध्ये जलप्रदूषणची चर्चा सुरू झाली आहे.४या पाण्यामध्ये रिजॉल, आॅक्सिजन, नायट्रोजन असल्याने कॅन्सर होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून उजनीचे जलप्रदूषण गाजत आहे; मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. उजनीच्या जलप्रदूषणाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा घेण्यात आलेली आहे.४काही वर्षांपूर्वी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह व बाहेरच्या देशातील जलतज्ज्ञांनी कुंभारगाव येथे येऊन उजनीच्या पाण्याची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्या वेळी या जलतज्ज्ञांनी हे पाणी पिण्यास तर सोडाच, पण ते हात धुण्यासाठीसुद्धा योग्य नसल्याचा निष्कर्ष काढला; परंतु शासकीय पातळीवर हे जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.४उजनी लगतच्या गावातील लोक हेच पाणी पितात. या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यात आले आहेत. तरीसुद्धा अनेक लोक हे पाणी पितात. 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूर