शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

उसात बटाट्याचे आंतरपीक

By admin | Updated: February 23, 2017 02:08 IST

बरदस्त इच्छाशक्ती व नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल, तर या जगात काहीच अशक्य

गोरख माझिरे / भूगावबरदस्त इच्छाशक्ती व नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल, तर या जगात काहीच अशक्य नाही. असेच काहीसे मुळशी तालुक्यात घडले. शेतीमध्ये अनेक प्रयोग यशस्वी करून दिलीप दगडे यांनी शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील मुळा नदीच्या तीरावर असलेल्या शेरे आणि अकोले या दोन गावांच्या सीमावर्ती भागात दिलीप दगडे यांची संयुक्त पद्धतीची शेती आहे. यामध्ये काही क्षेत्रात ऊस, ४ एकर क्षेत्रात आमराई, ४ एकर क्षेत्रात भातलागवड व भातकाढणी झाल्यानंतर तरकारी केली जाते.एकत्र कुटुंब पद्धतीने नांदणाऱ्या या घरामध्ये दिलीप यांच्यासह चार बंधू व त्यांचे चुलत बंधूही राहतात. दिलीप यांनी आपल्या शेतावर मजुरांना कुटुंबासमवेत राहण्याची व्यवस्था केली. त्यामुळे त्यांना मजुरांची कमतरता कधीच भासली नाही. दिलीप यांच्या गोठ्यामध्ये सुमारे १२ देशी गाई, २ वळु, ४ खिलार गाई, ४ वासरे, २ बैल आहेत. घरच्या कालवडी विकल्या जात नाहीत. गाईपासून सुमारे २५ लिटर दूध मिळते. दूध घरी कामगारांना खाण्यापुरते व वासरांसाठी काढून उरलेल्या सर्व दुधाचे तूप काढले जाते. दररोज साधारण एक किलो तूप मिळते. तूप देशी गाईचे असल्याने तुपाला १८०० रुपये भाव मिळतो. मुक्त गोठ्याामुळे जनावरांच्या खालचे शेण न काढता त्यातून मिळालेले ताक या शेणात टाकले जाते. हे शेण ३ महिने काढत नाही, त्यामुळे नैसर्गिकपणे खत निर्मिती होऊन त्रासही वाचतो. गोमूत्रापासून जीवामृत तयार केले जाते. गांडूळ खत आणि जीवामृताच्या वापरामुळे शेतातील रासायनिक खतांच्या वापरावर नियंत्रण आले आहे. चार एकर क्षेत्रात पावसाळ्यात भातलागवड करतात. भातकाढणी झाल्यानंतर, तरकारी केली जाते. यामध्ये बटाटा, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो हे पीक घेतात. याला दोन वर्ष संपूर्णपणे सेंद्रिय खते दिली आहेत, यामुळे उत्पन्नात निश्चितपणे भरघोस वाढ झाली आहे.दिलीप यांच्याकडील एकरी ऊस उत्पादन ३०-३५ टनांच्या आसपासच होते. आता ते पाचट जागेवरच कुजवून त्याची खतनिर्मिती करून त्याचा वापर करता. लागवडीच्या उसाची तोडणी झाल्यानंतर यंदा त्यांनी पाचट न जाळण्याचा प्रयोग केला आहे. यंत्राद्वारे त्याची बारीक कुट्टी केली. युरिया, सुपर फॉस्फेट आदी खते टाकून ते कुजवण्याची प्रक्रिया केली. आज हा ऊस शेतात उभा आहे. या प्रयोगामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत मिळणार असल्याचे दगडे म्हणाले. मागील वर्षी सुमारे अडीच एकर पाचट कुजवलेल्या क्षेत्रात त्यांनी एकरी ६० टनांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे.