शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

राष्ट्र उभारणीची प्रेरणा संस्कृतीतूनच मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

पुणे : “भारताची ओळख ही केवळ येथील वंश, भाषा व जाती यांवर आधारित नसून ती एकात्म संस्कृतीतून निर्माण झाली ...

पुणे : “भारताची ओळख ही केवळ येथील वंश, भाषा व जाती यांवर आधारित नसून ती एकात्म संस्कृतीतून निर्माण झाली आहे. राष्ट्राच्या उभारणीची प्रेरणा ही त्याच्या संस्कृतीतूनच मिळते. ती परदेशातून आयात करून चालत नाही,” असे मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ‘भारतीय एकतेची मूलभूत तत्त्वे’ या विषयावर आरिफ मोहम्मद खान बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश कुलकर्णी, प्रा. शांतीश्री पंडित, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी या वेळी उपस्थित होते.

आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, भारतीय संस्कृती सर्व प्राणिमात्रांना समान प्रतिष्ठा देते. या संस्कृतीची मुळे वेद व उपनिषदांमध्ये आहेत. नवीन पिढीने हा सांस्कृतिक ठेवा वृद्धिंगत केला पाहिजे. दीर्घकाळ ज्या राष्ट्राला नाकारले गेले, ज्यावर परकीय राज्य करत होते, त्या राष्ट्राच्या उत्थान्नाची प्रेरणा ही परदेशी विचारांनी प्रभावित असू शकत नाही. भारतासाठीसुद्धा हा प्रेरणास्रोत इथल्या संस्कृती आणि परंपरांच्या मुळाशी दडलेला आहे. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “भारतीय प्रबोधनात आणि शैक्षणिक क्षेत्रात पुण्याचे मौलिक योगदान आहे. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, नामदार गोखले यांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुण्याला वारसा असून तोच विद्यापीठ पुढे चालवत आहे.”

चौकट

“जगातील इतर देशांप्रमाणे भाषा, राहणीमान, उपासना पद्धत, प्रांत किंवा वर्णाच्या आधारे भारतीय सभ्यतेच्या बाबतीत मापदंड लावता येणार नाही. कारण, भारतात वेगवेगळ्या उपासना पद्धती, भाषा, राहणीमान, वर्ण सर्वच काही आहे. एका मापदंडात इथली सभ्यतेची परिभाषा करता येणार नाही.”

-आरिफ मोहम्मद खान, राज्यपाल, केरळ