शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

राष्ट्र उभारणीची प्रेरणा संस्कृतीतूनच मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

पुणे : “भारताची ओळख ही केवळ येथील वंश, भाषा व जाती यांवर आधारित नसून ती एकात्म संस्कृतीतून निर्माण झाली ...

पुणे : “भारताची ओळख ही केवळ येथील वंश, भाषा व जाती यांवर आधारित नसून ती एकात्म संस्कृतीतून निर्माण झाली आहे. राष्ट्राच्या उभारणीची प्रेरणा ही त्याच्या संस्कृतीतूनच मिळते. ती परदेशातून आयात करून चालत नाही,” असे मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ‘भारतीय एकतेची मूलभूत तत्त्वे’ या विषयावर आरिफ मोहम्मद खान बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश कुलकर्णी, प्रा. शांतीश्री पंडित, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी या वेळी उपस्थित होते.

आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, भारतीय संस्कृती सर्व प्राणिमात्रांना समान प्रतिष्ठा देते. या संस्कृतीची मुळे वेद व उपनिषदांमध्ये आहेत. नवीन पिढीने हा सांस्कृतिक ठेवा वृद्धिंगत केला पाहिजे. दीर्घकाळ ज्या राष्ट्राला नाकारले गेले, ज्यावर परकीय राज्य करत होते, त्या राष्ट्राच्या उत्थान्नाची प्रेरणा ही परदेशी विचारांनी प्रभावित असू शकत नाही. भारतासाठीसुद्धा हा प्रेरणास्रोत इथल्या संस्कृती आणि परंपरांच्या मुळाशी दडलेला आहे. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “भारतीय प्रबोधनात आणि शैक्षणिक क्षेत्रात पुण्याचे मौलिक योगदान आहे. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, नामदार गोखले यांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुण्याला वारसा असून तोच विद्यापीठ पुढे चालवत आहे.”

चौकट

“जगातील इतर देशांप्रमाणे भाषा, राहणीमान, उपासना पद्धत, प्रांत किंवा वर्णाच्या आधारे भारतीय सभ्यतेच्या बाबतीत मापदंड लावता येणार नाही. कारण, भारतात वेगवेगळ्या उपासना पद्धती, भाषा, राहणीमान, वर्ण सर्वच काही आहे. एका मापदंडात इथली सभ्यतेची परिभाषा करता येणार नाही.”

-आरिफ मोहम्मद खान, राज्यपाल, केरळ