शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल दिरंगाईची चौकशी

By admin | Updated: February 26, 2015 03:19 IST

जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजेनेच्या माध्यमातून होणाऱ्या घरकुल योजनेबाबत झालेल्या दिरंगाईबाबतचा प्रश्न संसदेत मांडला.

पिंपरी : जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजेनेच्या माध्यमातून होणाऱ्या घरकुल योजनेबाबत झालेल्या दिरंगाईबाबतचा प्रश्न संसदेत मांडला. त्यावर या योजनेची चौकशी करू, असे उत्तर केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिले, अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज दिली. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजेनेच्या (जेएनएनयूआरएम)अंतर्गत शहरी गरिबांसाठीच्या घरकुल उभारण्याची योजना जाहीर झाली होती. या योजनेचे त्यानुसार महापालिका, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या निधीतून हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले होते. २००८ मध्ये ही योजना सुरू झाली होती. त्यानुसार १३ हजार २५० लाभार्थींना दीड लाखात घर देण्याचे महापालिकेने जाहीर केले होते. या योजनेचा फायदा मिळावा यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. परंतु प्रकल्प रखडल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. निवडणुकीमध्येही या मुद्दयावर चर्चा झाली होती. महापालिका आणि विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीतीतील जाहीरनाम्यात योजनेचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. घरकुलाचे श्रेय मिळावे हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, सात वर्षे होऊनही ही योजना पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पहिल्या टप्प्यात ६ हजार ७२० लाभार्थीना घरे देण्याचे जाहीर करण्यात आले होते. जमीन हस्तांतरण, प्राधिकरणाच्या विविध परवानग्या यास झालेला उशीर यामुळे इमारती उभारण्यास उशीर झाला. त्यामुळे घरांची किमत पावणेचार लाखांवर गेली. आजवर केवळ दोन हजार लाभार्थींना घरांचा ताबा दिला आहे. घर निर्माण करण्यासाठीचा वाढलेला खर्च यामुळे पावणेचार लाखांत घर देणे शक्य नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. महापालिकेला घरकुल योजनेसाठी केंद्राकडून मोठा निधी प्राप्त झाला असूनही ४० टक्केच घरांचे वाटप झाले आहे. कामही अपूर्ण आहे. संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासांत खासदार बारणे यांनी याविषयीचा प्रश्न बुधवारी मांडला. बारणे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला जेएनएनयूआरएमअंतर्गत शहरी गरिबांसाठीच्या असणारऱ्या घरकुल योजनेसाठी केंद्राकडून मोठा निधी प्राप्त झाला असूनही ४० टक्केच घरांचे वाटप झाले आहे. केंद्र व राज्याकडून निधी मिळूनही ही योजना महानगरपालिका वेळेत पूर्ण करू शकलेली नाही.(प्रतिनिधी)