शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
3
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
4
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
5
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
6
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
7
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
9
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
10
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
11
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
12
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
13
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
14
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
16
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
17
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
18
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
19
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
20
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!

बदल्यांमध्ये कोकणातील शिक्षकांवर अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 1:28 AM

संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात दोन टक्के जागा रिक्त आहेत. कोकणातील रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शिक्षक वर्षानुवर्ष त्याच जिल्ह्यात कार्यरत आहेत

पुणे : महाराष्ट्र शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी शिक्षक आंतर जिल्हा बदली टप्पा ३ ची बदली प्रक्रिया राबविण्यात संबंधी आदेश निर्गमित केले आहेत. परंतु या प्रक्रियेत दहा टक्क्यापेक्षा जात पदे रिक्त असलेल्या काही विशिष्ट जिल्ह्यातील शिक्षकांवर अन्याय होत आहे. कोकणात वर्षानुवर्षे हे शिक्षक कार्यरत आहे. त्यांची लवकरात लवकर बदली व्हावी अशी मागणी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्यचे सरचिटणीस संतोष जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात दोन टक्के जागा रिक्त आहेत. कोकणातील रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शिक्षक वर्षानुवर्ष त्याच जिल्ह्यात कार्यरत आहेत. शासनाच्या बदली टप्पा तीन या प्रक्रियेनुसार दर तीन वर्षांनी बदली होती. पण या चार जिल्ह्यात ही बदली झाली नाही. शासनाने या जिल्ह्यातील बदली करून शिक्षकांना अन्य कुठल्याही जिल्ह्यात नोकरी द्यावी. त्यामुळे कोकणात जे टीईटी परीक्षा पास झालेले तरुण विद्यार्थी आहेत त्यांना संधी मिळेल.

पूर्ण महाराष्ट्रात एकूण १६,५८५ जागा रिक्त आहेत. या जागेचा शासन अजिबात विचार करत नाही. सन २०११ आंतर जिल्हा बदली धोरण बदलून २०१७मध्ये आॅनलाईन आंतर जिल्हा बदलीचे धोरण अवलंबले. टप्पा २ च्या प्रक्रियेत या धोरणानुसार कोणतीही सूचना न देता कोकणातील या ४ जिल्ह्यांना वगळले गेले. इतर जिल्ह्यातील शिक्षकांना संबंधित जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीचा लाभ मिळाला. आमचे शिक्षक आंतर जिल्हा बदलीच्या नवीन धोरणात पात्र ठरत नाहीत. यामुळे समान संधीच्या घटनेतील अधिकाराचा भंग होत आहे. त्याचा फटका अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेतील जिल्हा परिषद शिक्षकांना बसत आहे. कोकणातील बदलीग्रस्त शिक्षकांना इतर जिल्ह्याप्रमाणे संधी दिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

टॅग्स :Teacherशिक्षकPuneपुणे