शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

...आणि त्यांनी उचलला झाडांना वेदनामुक्त करण्याचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:12 IST

झाडांना वेदाना मुक्त करण्यासाठी नेल फ्री,अाणि पेन फ्री हे कॅम्पेन पुण्यातील माधव पाटील व त्यांचे सहकारी राबवत अाहेत. यात शहरातील झाडांना ठाेकण्यात अालेले खिळे काढण्याचे काम दर अाठवड्याच्या रविवारी करण्यात येते.

ठळक मुद्देगेल्या तीन अाठवड्यांपासून सुरु अाहे कॅम्पेनएक किलाेहून अधिक वजन भरेल इतके खिळे व तारा झाडांवरुन काढण्यात अाल्या

पुणे : बाहेरगावी असल्याने अंगणातील तुळशीला पाणी देता न आल्याने तुळस सुकून गेली.  आपण पाणी देऊ न शकल्याने तुळस मेल्याचे मुलीने वडीलांना सांगितले. मुलीच्या तुळस मेली या शब्दप्रयोगाने त्यांच्या मनात घर केले. आणि येथून पुढे प्रत्येक झाडाला वेदनामुक्त करण्याचा विडाच त्यांनी उचलला.    ही कहाणी आहे, पुण्यात अंघोळीची गोळी या शिर्षकाखाली पर्यावरण रक्षणाबाबत जागृती करणाऱ्या माधव पाटील यांची. माधव पाटील आणि त्यांच्या मित्रांनी नेल फ्री अ‍ॅण्ड पेन फ्री ट्री असे कॅम्पेन सुरु केले असून या अंतर्गत पुणे शहरातील विविध झाडांना जाहीरात लावण्यासाठी ठोकण्यात आलेले खिळे काढण्याचे काम करण्यात येत आहे.  गेल्या तीन आठवड्यांपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून आत्तापर्यंत शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते बालगंधर्व पर्यंत असलेल्या झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढण्यात आले आहेत. 

    माधव पाटील हे पेशाने इलेक्ट्रिक कल्संटंट आहेत. मात्र त्यांना लहानपणापासूनच पर्यावरणाबद्दल आस्था आहे. त्यांनी आंघोळीची गोळी या शिर्षकाखाली या आधीही अनेक उपक्रम राबविले आहे. पाटील हे झाडांच्या संवदेना यांवर अभ्यास करत असताना झाडांनाही भावना असतात याचे विस्तृत विवेचना करणारा लेख त्यांच्या वाचणात आला. तेव्हापासून त्यांच्या डोक्यात वेदनामुक्त झाड ही संकल्पना घोळत होती. यंदाच्या होळी पासून त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. दर रविवारी पाटील व त्यांचे सहकारी भेटून शहरातील विविध भागातील झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढण्याचे काम करताता. दर आठवड्याला कमीत कमी दहा झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढायचेच असा दृढ निष्चय त्यांच्या टीमने केला आहे.     या बाबात बोलताना पाटील म्हणाले, झाडांनाही वेदना असतात याबद्दलचा लेख माझ्या वाचणात आला होता. त्यातच आमच्या अंगणातील तुळस पाण्याअभावी जळून गेल्याचे माझ्या मुलीने माझ्या निदर्शनास आणले. तेव्हापासून झाडांना नेल फ्री व पेन फ्री करण्याचा विचार डोक्यात घोळत होता. यंदाच्या होळी पासून आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली आहे. हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांना या अभियानात सामिल करुन घेण्याचा आमचा विचार आहे. 

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरenvironmentवातावरण