शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

आरआरसी अंमलबजावणीत जप्ती प्रक्रियेचा अडथळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 13:27 IST

एफआरपी रक्कम न देणाऱ्या ६८ कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने रेव्हेन्यू रिकव्हरी सर्र्टिफिकेट (आरआरसी) बजावण्याची कारवाई केली आहे.  

ठळक मुद्देजिल्हाधिकारी साशंक : जप्त मालाच्या सुरक्षिततेचाही सतावतोय प्रश्नकायद्यानुसार आरआरसी बजावल्यानंतर शेतकऱ्यांची देणी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची जवळपास सर्वच कारखाने साखरेवर तारण कर्ज घेऊन पैसे उचलतात.

पुणे : शेतकऱ्यांची ऊसबिल देणी थकविणाºया कारखान्यांविरोधात साखर आयुक्तालयाने जप्तीची कारवाई करूनही जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याची ओरड सुरू आहे. जप्तीची प्रक्रिया नक्की राबवायची कशी, कारखान्यांच्या मालावर असलेला बँकेचा बोजा, माल जप्तीनंतर लिलाव प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जप्त मालाची घ्यावी लागणारी काळजी, असे अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित होत असल्याने आरआरसी कारवाई कागदावरच राहत असल्याचे चित्र आहे. गाळप हंगाम नुकताच संपला आहे. एप्रिलअखेरीस कारखान्यांकडे ३६०० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. तर, ३१ कारखान्यांकडे चालू हंगामापूर्वीची तब्बल अडीचशे कोटी रुपये थकीत आहेत. शुगर केन कंट्रोल अ‍ॅक्टनुसार कारखान्याने शेतकऱ्यांशी वैयक्तिक करार केले नसल्यास, त्यांना १४ दिवसांच्या आत उसाच्या रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देणे बंधनकारक आहे. एप्रिल अखेरीस १९५ पैकी अवघ्या ४३ कारखान्यांनीच एफआरपीची पूर्ण रक्कम दिलेली आहे. एफआरपी रक्कम न देणाऱ्या ६८ कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने रेव्हेन्यू रिकव्हरी सर्र्टिफिकेट (आरआरसी) बजावण्याची कारवाई केली आहे.  कायद्यानुसार आरआरसी बजावल्यानंतर शेतकऱ्यांची देणी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची असते. मात्र, अनेक जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्यांवर जप्तीची प्रक्रिया कशी करायची हेच माहिती नाही. कारखान्यांचे मूळ उत्पादन साखर असून, इथेनॉल, मोलॅसिस यांसारखे उपपदार्थ देखील कारखाने तयार करतात. जवळपास सर्वच कारखाने साखरेवर तारण कर्ज घेऊन पैसे उचलतात. अशा स्थितीत बँकेचा अधिकार साखरेवर येतो.   .......साखर जप्त केल्यानंतर बँकेच्या तारणाचा प्रश्न उपस्थित राहतो. मात्र, कारखान्याने तयार केलेली साखर मर्यादित कालावधीसाठी तारण असते. याशिवाय अनेकदा संपूर्ण साखर तारण नसते. ते पाहून माल जप्त करता येतो. तसेच, तारण मुदत संपल्यानंतर तयार झालेल्या साखरेवर देखील हक्क सांगता येईल. याशिवाय कारखान्यांच्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊनदेखील कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. नक्की आरआरसीची अंमलबजावणी कशी करायची याबाबत जिल्हाधिकाऱ्याशी थेट संपर्क साधण्यात येत आहे. -  शेखर गायकवाड, साखर आयुक्त.......

अशी फसली कारवाई ...* जळगावच्या मधुकर सहकारी कारखान्यावर ऊस उत्पादकांचे ५७ कोटी रुपये थकविल्याप्रकरणी आरआरसी कारवाई केली होती. त्यावर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांने जप्तीची कारवाई केली. अशी कारवाई करताना त्यांच्या कार्यालयाला सील ठोकले. *कारखान्याने आमची सर्व कागदपत्रे कार्यालयात असल्याने गाळप आणि शेतकऱ्यांच्या थकीत रक्कम अशी माहिती देता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा कारखान्याचे सील काढावे लागले. * या प्रक्रियेत साखर, उपपदार्थ अथवा स्थावर मालमत्ता जप्त करणे अपेक्षित असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले..अशी करता येऊ शकते जप्ती...

* साखर, मोलॅसिस, ब गॅस* जप्त केलेल्या मालाच्या संरक्षणाची हमी घ्यावी लागेल* माल जप्त केल्यानंतर ई लिलाव ते शेतकऱ्यांचे पैसे देण्याची जबाबदारी* आव्हान : ज्वलनशील इथेनॉलची जप्ती केल्यानंतर त्याचे करायचे काय* जप्त मालाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र व्यक्तीची करावी लागेल नेमणूक .......

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेcollectorजिल्हाधिकारी