शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

निवडणुकांमध्ये बटन दाबताना महागाई लक्षात राहिली पाहिजे; अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 14:44 IST

आगामी निवडणुकांमध्ये महागाई, बेरोजगारीचे प्रश्न असे मुद्दे प्रभावी ठरणार

बारामती : महागाई कशी वाढत चालली आहे, ती सतत तुमच्या डोक्यात रहावी, म्हणून मी तुमच्या लक्षात आणून देत आहे. कुठे बटन दाबताना ही महागाई लक्षात राहिली पाहिजे, अशा मिश्किल शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वाढत्या महागाईवर सत्ताधाऱ्यांना चिमटे घेतले.

बारामती येथे रविवारी (दि. २१) ज्येष्ठ नागरिक निवास  येथील वाढीव भोजन कक्ष व करमणूक कक्ष इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, येथील एका कक्षाचे बांधकाम ५० हजारात पूर्वी झाले होते. मात्र त्याच्या नुतनीकरणासाठी ३ लाख रूपये खर्च आला. महागाई कशी वाढत चालली आहे. हे तुमच्या लक्षात रहावे यासाठी मी सांगतो आहे. त्यामुळे येथून पुढे बटन दाबताना महागाई लक्षात ठेवा, अशा शब्दात अजित पवार यांनी येणाऱ्या  निवडणुकांमध्ये महागाईचा मुद्दा प्रभावी ठरणार असल्याचे सुतोवाच केले. ते पुढे म्हणाले,  देशासमोर महागाई, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, असेही पवार म्हणाले. दरम्यान, देशाची लोकसंख्या वाढली आहे. चीनला देखील लोकसंख्येच्या बाबतीत आपण मागे टाकले आहे. तरूणांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ज्येष्ठांची संख्या देखील वाढली आहे. घरामध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काही मेडीकल इमर्जन्सी आली तर अशा वेळी ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र उपयुक्त आहे, असेही पवार म्हणाले.

अजितदादांनी घेतली सुनेत्रावहिनींची फिरकी...

बोलण्याच्या ओघामध्ये अजितदादांनी लोकसंख्येचे प्रमाण व त्यातील तरूणांचा टक्का व ज्येष्ठांचा टक्का किती प्रमाणात आहे. याची माहिती दिली. ‘सध्या भारतात तरूणांची संख्या मोठी आहे, भारतियांचे सरासरी आर्युमान २८ वर्षे इतके आहे. देशात ६० पेक्षा जास्त ज्येष्ठांची संख्या १० टक्के आहे. देशात १३ कोटी ५० लाख  लोकं ६० वर्षांच्या पुढची आहेत. यामध्ये अजित पवारचा सुद्धा नंबर लागतो आणि लवकरच सुनेत्राचा सुद्धा लागणार आहे, या वाक्यावर सुनेत्रावहिनींनी हसुन दाद दिली. तर उपस्थिांमध्ये देखील खसखस पिकली.

चपटीसाठी विकले पुलाच्या संरक्षक कठड्यावरील भाले...

विरोधी पक्षनेते अजित पवार हे आठवड्यातून एकदातरी बारामतीतील विकासकामांची काळजीपूर्वक पहाणी करत असतात. बाबूजी नाईकवाड्या जवळील नदीपात्रातून कसब्याकडे जाण्यासाठी नविन पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या पुलाच्या संरक्षक कठड्यावर लोखंडी सळईच्या भाल्याचे नक्षीकाम करण्यात आले होते. मात्र आज हा पुल पाहताना अजित पवार यांना यातील  भाले गायब झाल्याचे लक्षात आले. याबाबत येथील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘येथील सुरक्षारक्षक भिंतीवर लोखंडी ग्रील बसवले आहे. व त्यावर भाले काढले होते. यातील सगळे भाले चोरीला गेले. मी म्हणालो हे कोण घेऊन जातो. तेंव्हा एकाने सांगितले दादा एक भाला काढला की शंभर रूपये मिळतात. शंभर रूपये मिळाले की ५० रूपयाला एक दारूचा तुकडा म्हणजे चपटी मिळते. एका भाल्यात दोन चपट्या मिळतात. त्याचं भागतं. आपण करतोय काय कशाचा कशाला मेळ नाही, असा किस्सा आज अजित पवार यांनी सांगितला. नविन  बसस्थानकाचे काम सध्या सुरू आहे. येथे मात्र जे चोरता येणार नाही. ते करण्याचा प्रयत्न करतोय. जीवात जीव असे पर्यंत बारामतीकरांचे भलेच करणार असेही यावेळी अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक