शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तहसिलदारांसाठी तालुका एकवटला, बदली रद्दसाठी इंदापूरला लाक्षणिक उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 23:03 IST

‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम २००५ या कायद्याचे कलम ३ नुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकारी अ, ब आणि क गटांतील राज्य शासनाचे सर्व सेवक किंवा कर्मचारी यांच्यासाठी एखाद्या पदावर काम करण्याचा सामान्य कालावधी

इंदापूर : इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली अधिनियम कायद्याचे पालन न करता नियमबाह्य पद्धतीने केल्याने नागरिकांमधून निषेध नोंदविण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने शनिवारी (दि. २५) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने या वेळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांसाठी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम २००५ या कायद्याचे कलम ३ नुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकारी अ, ब आणि क गटांतील राज्य शासनाचे सर्व सेवक किंवा कर्मचारी यांच्यासाठी एखाद्या पदावर काम करण्याचा सामान्य कालावधी हा ३ वर्षांचाआहे. असे असताना इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या बदलीची कारणे कोणती व कोणत्या कायद्याने शासनाने बदली केली, असा सवाल नागरिक विचारत आहेत. यावेळी इंदापूर सजग नागरिक, बहुजन मुक्ती पार्टी, विचार मंथन परिवार, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया युवक आघाडी, बहुजन क्रांती मोर्चा, मातंग समाज एकता आंदोलन, अखिल भारतीय मराठा मोर्चा, शेतकरी संघटना, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन संघटना, अनेक विद्यार्थी संघटना यांनी पाटील यांची बदली रोखण्यासाठी शासनाला वेगवेगळी निवेदने दिली.शनिवार (दि. २५) रोजी सकाळी १० ते ५ पर्यंत तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, विविध संस्थांचे कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी यांनी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. सर्व संघटनांनी निवेदनामध्ये इशारा दिला आहे की, या उपोषणानंतर शासनाने बदली रद्द न केल्यास सविनय मार्गाने सत्याग्रह करणार आहे. यावेळी जनार्दन पांढरमिसे, बाबासाहेब भोंग, अनिल खोत, भजनदास पवार, प्रवीण पवार, अमर बोराटे, तानाजी मारकड, विचार मंथन परिवाराचे अ‍ॅड. विशाल चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, प्रकाश पवार, नितीन आरडे, उजेर शेख, धनाजी सुर्वे, राजेंद्र हजारे, बाळासाहेब सरोदे, सूरज वनसाळे, कालिदास देवकर, गुलाबराव फलफले, हनुमंत कदम, अ‍ॅड. तुषार झेंडे, सुनिल गलांडे, रत्नाकर मखरे, लक्ष्मण देवकाते आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकाल पूर्ण नसताना बदली कशी?इंदापूरचे तहसीलदार यांनी मागील २ वर्षांत त्यांच्या पदाला न्याय दिला असून, सर्वसामान्य गरीब, शेतकरी यांची वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी कामे करून, वंचितांना केंद्रबिंदू मानून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. तहसील कार्यालयामध्ये पारदर्शकता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन व गतिमान व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, तालुक्याच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावून प्रशासनाची मान उंचावली; मात्र तरीही त्यांच्या पदाचा ३ वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत नसतानादेखील बदली कशी करण्यात येत आहे,असा सवाल नागरिक करत आहेत.

पोलीस पाटील संघटनेचे निवेदनबदली तातडीने रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस पाटील संघटनेच्यावतीने भिगवण पोलिसांना देण्यात आले आहे, तर बदली रद्द करण्यासाठी उपोषणाचा मार्ग निवडूनही बदली रद्द न झाल्यास तालुक्यातील अनेक गावांतून रास्तारोको केला जाणार असल्याची माहिती पोलीस पाटील संघटनेनी दिली. यावेळी राजेंद्र तांबिले, अशोक घोगरे, संजय कांबळे उपस्थित होते.८०च्या वर गावांची सह्यांची मोहीमतालुक्यातील ८०च्या वर गावांनी सह्यांची मोहीम राबवीत बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. तरुणांनीदेखील सोशल मीडियातून तहसीलदार यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक ग्रुपवर तहसीलदार यांच्या बाजूने विचार मांडण्याचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे.जनसामान्य नागरिकांच्या अडचणी समाधानकारक सोडवण्याचे काम श्रीकांत पाटील करत होते, प्रशासनात झीरो पेंडन्सी काम करून आदर्श निर्माण करणारा एक प्रामाणिक अधिकारी इंदापूरमधून जाणे म्हणजे जनसामान्य लोकांचे नुकसानच आहे. शासनाने त्यांची त्वरित बदली रद्द करून जनसामान्य लोकांना शासनानेच न्याय द्यावा हीच मागणी आहे.- पृथ्वीराज जाचक,राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष

टॅग्स :TransferबदलीPoliceपोलिसPuneपुणे