शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

आंतरराष्ट्रीय स्तरावरही युध्द होऊ नये हीच भारताची भूमिका; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 21:00 IST

भारत लवकरच जगातील सर्वात माेठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार

पुणे : भारताच्या पंतप्रधानांनी रशियन राष्ट्रप्रमुखांना युध्द थांबले पाहिजे असे सांगितले हाेते. मात्र, ते आपल्या हातात नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत हा कायमच युध्द हाेउ नये अशी भूमिका मांडत आलेला आहे. ही युध्द करण्याची वेळ नाही असे मत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रेंजहिल्स कॅम्पस येथे एमबीए च्या विद्यार्थ्यांसाठी निवासी संकुलाचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘ फिल्ड मार्शल माणेकशॉ स्मृती व्याख्यानात ‘ राष्ट्रउभारणीत युवकांचे याेगदान’ या विषयावर ते बाेलत हाेते. यावेळी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) चे संस्थापक अध्यक्ष, कुलपती प्रा. डाॅ. शां. ब. मुजुमदार, प्र. कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, संचालक ब्रिगेडियर निवृत्त राजीव दिवेकर उपस्थित हाेते.

सिंह म्हणाले, भारताने मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केला जात आहे. एक विश्वसनीय आणि आवडते गुंतवणुकीचे ठिकाण झाले आहे. भारत लवकरच जगातील सर्वात माेठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हाेईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भारतात ऋषी मुनींनी प्राचीन काळापासून व्यवस्थापन, नियोजनासंबंधी ग्रंथात विचार व्यक्त केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी आधुनिक आणि प्राचीन ज्ञानही आत्मसात केले पाहिजे तेव्हा त्यांना भारतीयत्व समजेल. सामाजिक अर्थिक वृध्दीमध्ये व्यवस्थापनाची भूमिका महत्वाची असते. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरूणांनी याेगदान द्यावे.

शस्त्रसामग्री निर्यात १६ हजार काेटींवर

शस्त्रसामग्री निर्मित्ती मध्ये भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. देशात २०१४ मध्ये ९ हजार काेटी रूपयांची निर्यात २०२३ मध्ये साेळा हजार काेटींवर गेली आहे. तसेच येत्या २०२६ पर्यंत ३५ ते ४० हजार काेटींपर्यंत जाईल असे राजनाथ सिंह म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयDefenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंह