शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

आंतरराष्ट्रीय स्तरावरही युध्द होऊ नये हीच भारताची भूमिका; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 21:00 IST

भारत लवकरच जगातील सर्वात माेठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार

पुणे : भारताच्या पंतप्रधानांनी रशियन राष्ट्रप्रमुखांना युध्द थांबले पाहिजे असे सांगितले हाेते. मात्र, ते आपल्या हातात नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत हा कायमच युध्द हाेउ नये अशी भूमिका मांडत आलेला आहे. ही युध्द करण्याची वेळ नाही असे मत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रेंजहिल्स कॅम्पस येथे एमबीए च्या विद्यार्थ्यांसाठी निवासी संकुलाचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘ फिल्ड मार्शल माणेकशॉ स्मृती व्याख्यानात ‘ राष्ट्रउभारणीत युवकांचे याेगदान’ या विषयावर ते बाेलत हाेते. यावेळी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) चे संस्थापक अध्यक्ष, कुलपती प्रा. डाॅ. शां. ब. मुजुमदार, प्र. कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, संचालक ब्रिगेडियर निवृत्त राजीव दिवेकर उपस्थित हाेते.

सिंह म्हणाले, भारताने मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केला जात आहे. एक विश्वसनीय आणि आवडते गुंतवणुकीचे ठिकाण झाले आहे. भारत लवकरच जगातील सर्वात माेठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हाेईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भारतात ऋषी मुनींनी प्राचीन काळापासून व्यवस्थापन, नियोजनासंबंधी ग्रंथात विचार व्यक्त केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी आधुनिक आणि प्राचीन ज्ञानही आत्मसात केले पाहिजे तेव्हा त्यांना भारतीयत्व समजेल. सामाजिक अर्थिक वृध्दीमध्ये व्यवस्थापनाची भूमिका महत्वाची असते. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरूणांनी याेगदान द्यावे.

शस्त्रसामग्री निर्यात १६ हजार काेटींवर

शस्त्रसामग्री निर्मित्ती मध्ये भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. देशात २०१४ मध्ये ९ हजार काेटी रूपयांची निर्यात २०२३ मध्ये साेळा हजार काेटींवर गेली आहे. तसेच येत्या २०२६ पर्यंत ३५ ते ४० हजार काेटींपर्यंत जाईल असे राजनाथ सिंह म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयDefenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंह