शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Railway | ‘मिशन जीवन रक्षक’ अंतर्गत RPF ने वाचवले ८६ प्रवाशांचे प्राण

By नितीश गोवंडे | Updated: April 8, 2023 17:26 IST

काहीवेळा यात स्वत:चा जीव धोक्यात घालून देखील सर्वसामान्य नागरिकाच्या प्राणाचे रक्षण आरपीएफच्या जवानांनी केले आहे...

पुणे :रेल्वे सुरक्षा दलामार्फत रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण तसेच प्रवाशांची मदत करण्याचे काम केले जाते. ‘मिशन जीवन रक्षक’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) ८६ प्रवाशांचे प्राण वाचवले. काहीवेळा यात स्वत:चा जीव धोक्यात घालून देखील सर्वसामान्य नागरिकाच्या प्राणाचे रक्षण आरपीएफच्या जवानांनी केले आहे.

८६ घटनांपैकी पुणे विभागात १३ व्यक्तींचा जीव वाचवण्यात आला आहे, तर मुंबई विभागात ३३, नागपूर विभागात १७, भुसावळ विभागात १७ आणि सोलापूर विभागात ६ व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, रेल्वेच्या वाहतुकीतील अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वे आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवून देणे या जबाबजाऱ्या देखील तेवढ्याच सक्षमपणे पार पाडल्या आहेत.

आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या रेल्वेमध्ये चढताना किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचा देखील जीव वाचवण्यात आला आहे. तरी, प्रवाशांनी धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा अथवा उतरण्याचा प्रयत्न करून आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन मध्य रेल्वे तर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस