शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

पाकिस्तानी सिंधींना मिळाले भारतीय नागरिकत्व : प्रमाणपत्राचे वाटप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 12:09 IST

गेल्या अनेक वर्षांपासून भारतात वास्तव्यास असलेल्या २२ सिंधी व्यक्तींना मंगळवारी भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र देण्यात आले

ठळक मुद्देअजूनही पाचशे व्यक्ती नागरिकत्वाच्या प्रतिक्षेतपरदेशी व्यक्ती नोंदणी कार्यालय (एफआरओ) आणि गुप्तचर विभगाकडून प्रक्रिया जलद पाकिस्तानात असताना आम्हाला अल्पसंख्यांक म्हणून खूप त्रासाला सामोरे जावे लागले

पुणे : पाकिस्तानात अल्पसंख्यांक म्हणून हिणवले जायचे...भारतात आल्यावर पाकिस्तानी म्हणून वेगळ्या भावनेने पाहिले जात होते, अशा कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानातील सिंधी व्यक्तींना अनेक वर्षांच्या झगड्यानंतर भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतात वास्तव्यास असलेल्या २२ सिंधी व्यक्तींना मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र देण्यात आले. शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजूनही पाचशेच्यावर पाकिस्तानि निर्वासित नागरिकत्वाच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सिंधी समाजाकील धर्मगुरु संत युधिष्ठीर लालजी, हेमंत निकम, नागपूरचे वीरेंद्र कुकरेजा, डब्बू आसवानी, बाळासाहेब रुणवाल आणि सिंधी समाजातील व्यक्ती होत्या. डॉ. कटारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ‘भारत माता की जय’ असा घोष करताना दिसत होती. या पुढे भारतीय नागरिकांप्रमाणे मतदानाचा आणि मालमत्ता खरेदी करण्याचा देखील अधिकार त्यांना मिळणार आहे. त्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकत्व न मिळालेल्या तीनशे जणांचा मेळावा पिपंरी येथे झाला असून, अजूनही पाचशेवर व्यक्ती नागरिकत्वासाठी झटत आहेत. याबाबत माहिती देताना डॉ. कटारे म्हणाल्या, या पुर्वी नागरिकत्व देण्याचा अधिकार सरकारला होता. मात्र, २०१६मधे त्यात सुधारणा करुन जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले. जानेवारी-फेब्रुवारी २०१९मधे ५० जणांना नागरिकत्व देण्यात आले. अजूनही तीनशेच्यावर व्यक्तींच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरु आहे. नजीकच्या काळात पन्नास ते शंभर व्यक्तींना नागरिकत्व दिले जाईल. परदेशी व्यक्ती नोंदणी कार्यालय (एफआरओ) आणि गुप्तचर विभगाकडून प्रक्रिया जलद होत असल्याने, नागरिकत्व मिळण्याचा कालावधी कमी झाला आहे.  संत युधिष्ठीर म्हणाले, पाकिस्तानातून आलेले असले तरी ते मूळचे इथलेच रहिवासी आहेत. मात्र, त्यांच्याकडे पाकिस्तानी असल्याच्या नजरेतून पाहिले जात होते. आता त्यांना इतर नागरिकांप्रमाणे मतदान आणि मालमत्तेचे सर्व अधिकार प्राप्त होतील. ------------------१८ जून सिंधी नागरीक : पाकिस्तानातून स्थलांतरीत झाललेल्या दहा ते तीस वर्षांहून अधिककाळ वास्तव्यास असलेल्या सिंधी व्यक्तींना मंगळवारी भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.------------------पाकिस्तानात असताना आम्हाला अल्पसंख्यांक म्हणून खूप त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे २००८ साली आई, वडील आणि बहीण असे कुटुंबिय पुण्यात आलो. येथे सुका मेव्याच्या विक्रीचा व्यवसाय सुरु केला. नागरिकत्व नसल्याने मालमत्ता खरेदी करता येत नाही. त्यामुळे भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. येथेही, परदेशी नागरिकाप्रमाणे वागविले जात होते. नागरिकत्व मिळविण्यासाठी अनेकदा दिल्लीला खेटे मारावे लागले. त्यानंतरही नागरिकत्व मिळाले नाही. आता, माझी बहिण अंजली आस्वानी हीला नागरिकत्व मिळाले असून, माझा प्रस्ताव देखील लवकरच मार्गी लागेल. विशाल कालरा, स्थलांतरीत 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPakistanपाकिस्तान