शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासांत उधळले; संरक्षण दल प्रमुखांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:42 IST

धर्माच्या नावाखाली घडविलेल्या या हत्या केवळ अमानवीच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या होत्या

पुणे: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंंतर भारतीय लष्कराने मोठी कारवाई करीत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारतालाही ४८ तासांत शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करू, अशी वल्गना पाकिस्तानने केली होती. मात्र, भारतीय लष्कराने दिलेल्या उत्तराने पाकिस्तानची कारवाई अवघ्या आठ तासांतच संपविली, अशी स्पष्टोक्ती संरक्षण दल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) अनिल चौहान यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागा’तर्फे ‘भविष्यातील युद्ध आणि युद्धतंत्र’ या विषयावर चौहान यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. चारुशीला गायके, संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागाचे प्रमुख विजय खरे आदी उपस्थित होते. चौहान यांनी पहलगाम आणि अन्य लष्करी कारवायासंदर्भातील अनेक बाबींवर त्यांनी भाष्य केले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत त्यांनी पाकिस्तानच्या त्या फोनबाबतही भूमिका मांडली.

चौहान म्हणाले, “पहलगाम येथील दहशतवादी हल्ला भीषण होता. अनेकांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर धर्म विचारून क्रूरपणे गोळ्या घातल्या. धर्माच्या नावाखाली घडविलेल्या या हत्या केवळ अमानवीच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या होत्या. या घटनेनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्यावरील तत्काळ आणि कठोर प्रतिक्रिया होती. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी अनेक प्रकारच्या संरक्षण क्षमता आत्मसात केल्या आहेत. अशा परिस्थितीत धोका नेहमीच असतो. युद्धभूमीत क्षमतेची चाचणी घेतली जाते. येथे नेहमीच धोका असतो; पण, जोपर्यंत तुम्ही धोका पत्करत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. भारत आता दहशतवाद सहन करणार नाही. भारतावर हल्ला झाला, तर त्याचे प्रत्युत्तरही अधिक कठोर आणि अचूक दिले जाणार आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर अद्याप पूर्णपणे संपलेले नसून केवळ तात्पुरता शांतता करार झाला आहे. यासाठी सजग राहण्याची गरज आहे. पाकिस्तानने भारताला दहशतवादी कारवायांद्वारे वेठीस धरू नये. भारत आता दहशतवाद आणि अणुबॉम्बच्या दहशतीखाली जगणार नाही,” असेही जनरल चौहान यांनी स्पष्ट केले.

पराभव महत्त्वाचा नाही, निकाल महत्त्वाचा आहे : चौहान

ते म्हणाले, “युद्धभूमी ही क्षमतेची परीक्षा असते. येथे नेहमीच धोका असतो; पण, जोपर्यंत तुम्ही जोखीम घेत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. पराभव महत्त्वाचा नाही; पण, निकाल महत्त्वाचा आहे. व्यावसायिक लष्करावर पराभवाचा कोणताही परिणाम होत नाही. पाकिस्तानने प्रायोजित दहशतवाद थांबवावा, हा ‘ऑपरेशन सिंदूर’मागील विचार आहे. आपल्याकडे चांगल्या काउंटर ड्रोन सिस्टीम आहेत, याची आम्हाला माहिती होती.”

काही वर्षांनंतर ‘यंत्र विरुद्ध यंत्र’ युद्ध होण्याची शक्यता

जमीन, सागरी आणि हवाई अशा पारंपरिक क्षेत्रांबरोबरच आता अवकाश, सायबर, सेन्सर्स, प्रगत साहित्य, हायपरसोनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मोठा डेटा अशा अनेक क्षेत्रांपर्यंत युद्धाचा विस्तार झाला आहे. लष्करी कारवायांमधील पहिली क्रांती ही हाताने युद्ध करण्याशी संबंधित होती, ती जमिनीवरील आणि हवाई गतिशीलतेतील प्रगतीमुळे घडली. दुसरी क्रांती नेट केंद्रित होती, ज्यामध्ये माहिती अनन्यसाधारण महत्त्वाची बनली. आधी माणसा-माणसांत युद्ध व्हायचे. आता आपण अशा वळणावर आहोत, जेथे मानव आणि यंत्र यात युद्ध होऊ शकते आणि आगामी काळात यंत्र विरुद्ध यंत्र असे युद्ध पाहायला मिळेल.

पुन्हा एकदा १९६५ च्या कराराचा उल्लेख

१९६५ मध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करताना भारताविरुद्ध हजार वर्षांचे युद्ध घोषित केले होते. झिया-उल-हक यांनी या युद्धाच्या विशिष्ट सिद्धान्ताला मूर्त स्वरूप दिले. तेव्हापासून आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर एक साधन म्हणून पाकिस्तान करीत आहे. याबाबत अनेक पाश्चात्त्य युद्ध अभ्यासकांनीदेखील पाकिस्तानचे वरिष्ठ राजकीय आणि ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांचा दाखला दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानSocialसामाजिक