शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान-तंत्रज्ञानात भारत लवकरच " लीडर " : डॉ. रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 19:25 IST

उद्योगाकडे वळणाऱ्या तरूणांनी बेडुक उडी न घेता हनुमान उडी घ्यायला हवी.

पुणे : विज्ञानतंत्रज्ञान, नाविन्यता या गोष्टींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. लोकांमध्ये विज्ञानाविषयी प्रचंड उत्सुकता असून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापरही होत आहे. या क्षेत्रामध्ये तरूणांना अधिक संधी देण्यासाठी सकारात्मक धोरणे आखली जात आहेत. यांसह लोक सहभागातून देश लवकरच विज्ञान व तंत्रज्ञानात जगात '' लीडर'' म्हणून पुढे येईल, असा विश्वास प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला. आयसीएफएआय बिझनेस स्कुल, इन्स्टिट्यूट फॉर जनरेटिव्ह लीडरशिप, होप फाउंडेशनचे आयस्क्वेअरआयटी इंजिनिअरिंग कॉलेज आणि बीडब्ल्यू बिझनेसवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसºया इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवलच्या (आयबीएलएफ) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ह्यकेपीआयटीह्णचे सहसंस्थापक रवी पंडित, उद्योजक डॉ. गणेश नटराजन, ह्यबिझनेस वर्ल्डह्णचे डॉ. अनुराग बत्रा,  ह्यआयसीएफएआयह्णच्या संचालिका प्रा. ज्योती टिळक , शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. भारतकुमार अहुजा, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, फेस्टिवलचे संयोजक आणि लेखक समीर दुआ आदी उपस्थित होते.डॉ. माशेलकर म्हणाले, उद्योगाकडे वळणाऱ्या तरूणांनी बेडुक उडी न घेता हनुमान उडी घ्यायला हवी. धीरभाई अंबानी यांंच्या सारखे उदाहरण आपल्यासमोर आहे. प्रखर महात्वाकांक्षा असेल तर हे सहज शक्य आहे. स्टार्टअप इंडियामुळे व्यवसायातून नोकऱ्या निर्माण करण्याकडे तरुणांचा ओढा आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून आपण सार्वजनिक क्षेत्रासाठीच्या खरेदीतील १० टक्के खरेदी स्टार्ट अपकडून करायची, हे बंधनकारक केले आहे. तरूणांसाठी खुप चांगली धोरणे आणण्यात आली आहे. उद्योजकता विकसनासाठी निरनिराळे कार्यक्रम, धोरण राबविले जात आहे. विविध क्षेत्रांमध्ये असमतोल वाढत चालला आहे. इंधन क्षेत्राचाच विचार केल्यास ठराविक देश, कंपन्यांकडे ही मक्तेदारी आहे. त्यातून असमतोल वाढत आहे. चुकीच्या इंधन वापराने पर्यावरणावर परिणाम होत आहे. नागरी भागातील चरा व्यवस्थापन, वाहतुक हे महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व गोष्टींचा समतोल साधण्यासाठी तंत्रज्ञान, धोरण, लोकसहभाग आणि आर्थिक नियोजन याचा मेळ घालवा लागेल. ही आव्हाने पेलण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, अशी अपेक्षा रवी पंडित यांनी व्यक्त केली. डॉ. नटराजन यांनी ह्यउद्योग जगतात होत असलेले नवीन बदल उद्योजकांनी स्वीकारायला हवेत,ह्ण असे सांगितले. बत्रा, टिळक व दुआ यांनीही मनोगत व्यक्त केले. कटारा यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वैदही बॅनर्जी यांनी सुत्रसंचालन केले.--------------

टॅग्स :Puneपुणेtechnologyतंत्रज्ञानscienceविज्ञानIndiaभारत