शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

भारताने युक्रेनला मदत करावी, दुतावासाचे सचिव व्होलोडीमीर प्रयतुलांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 11:18 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेतील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते....

पुणे : भारताची भूमिका वैश्विक आहे. भारत ज्या पद्धतीने शेजारील राष्ट्रांना साहाय्य करतो तसेच त्यांनी युक्रेनला करावे. भारत आणि युक्रेनची लोकशाही मूल्ये सारखी आहेत. ती जपली जायला हवीत, असे मत युक्रेन दूतावासाचे द्वितीय सचिव व्होलोडीमीर प्रयतुला यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख लिखित ‘फ्रीडम ऑन फायर’ या कथासंग्रहाचे प्रकाशन युक्रेन दूतावासाचे द्वितीय सचिव व्होलोडीमीर प्रयतुला आणि चीनमधील माजी भारतीय राजदूत गौतम बंबावाले यांच्या हस्ते नुकतेच झाले. माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, लक्ष्मीकांत देशमुख, समीक्षक महेंद्र कदम, प्रकाशक अखिल मेहता उपस्थित होते.

भारत आणि सोव्हिएत संघात करार झाला होता. बांगलादेशाची निर्मिती होईपर्यंत संघाने मदत केली होती. त्यानंतरही युद्धासंबंधी सामग्रीत रशियाची मदत लाभली आहे. त्यामुळे भारत रशिया-युक्रेन युद्धाला स्वतःच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाईल, त्याकडे रोमॅण्टिसिझमने पाहता येणार नाही. तरीही भारताने रशियाच्या युद्धाचे समर्थन केलेले नाही. त्यामुळे भारताचे धोरण हे वास्तववादातून आलेले आहे, असे मत यावेळी माजी राजदूत गौतम बंबावले यांनी व्यक्त केले. भारताला जरी मोठ्या युद्धांची पार्श्वभूमी नसली तरी भारतीय सहिष्णुतेतून निर्माण झालेल्या या मानवतावादी कथा मध्यमवर्गीय माणसाला केंद्रस्थानी ठेवून उभ्या राहतात. मध्यमवर्गीय माणूस अनेक क्रांतीशी जोडला गेलेला आहे, हे स्पष्ट करणाऱ्या या कथा आहेत, त्यामुळे या कथांचे साहित्यिक मूल्यही विचारांचे नेमके बीज मांडते, असे मत यावेळी समीक्षक महेंद्र कदम यांनी व्यक्त केले.

रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मुळात हे युद्ध विषम शक्तींचे युद्ध आहे. साम्राज्यवादी वृती अजूनही जगातून नाहीशी झाली नाही. हे एका देशाने दुसऱ्या देशावर लादलेले युद्ध आहे आणि एक वैश्विक नागरिक म्हणून आपण आपली भूमिका मांडली पाहिजे, असे मत लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धPuneपुणे