शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

भारत एक मोठी उत्पादक बाजारपेठ म्हणून उदयाला येतीये - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 18:33 IST

जगाने आज आपल्याला एक मोठी संधी दिली

पुणे : जगाने आज आपल्याला एक मोठी संधी दिली. चीनकडे संशयाने पाहिले जात असताना भारत एक मोठी उत्पादक बाजारपेठ म्हणून उदयाला येत आहे. ही जी वेळ आज भारताला मिळाली आहे त्याचा आता सदुपयोग करायला पाहिजे. असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 

भारती विद्यापीठाच्या भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखु यांच्या उपस्थितीत झाले. भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्ताने पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी पवार बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह आणि प्र कुलगुरू आ. डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप ,हिमाचलचे  कॅबिनेट मंत्री संजय अवस्थी उपस्थित होते.   

फडणवीस म्हणाले, पतंगराव कदम जिंदादील होते. प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात होती. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात होती. ते आपल्यात नाहीत यावर आजही विश्वास बसत नाही.आदर पुनवाला आणि त्यांच्या टीमने जे काम केले ते त्यामुळे भारत काय आहे हे त्यांनी जगाला  दाखवून दिले. त्यांच्या या कार्याचा, सिरम इन्स्टिट्यूटचा आदर वाटतो. पतंगराव कदम यांच्या नावाने असलेला पहिला पुरस्कार आदर पुनवाला यांना दिला ते अतिशय समर्पक आहे.

भारती विद्यापीठ संस्थेने आता आपला मोर्चा विदर्भातही वळवावा

देशात आपण उच्चशिक्षणाचा मोठा विस्तार केला. अनेक खासगी संस्थानी त्यात बहुमूल्य योगदान दिले. सुरवातीला या खासगीकरणबद्दल लोकांच्या मनात शंका होती. मात्र भारती विद्यापीठ सारख्या संस्थांनी एक मिशन म्हणून हे काम हाती घेतले आणि ते पूर्णत्वास नेले. आपल्या शिक्षण क्षेत्रांत आपण ज्याप्रकारे पुढे जातो ते पाहता एक मोठा बदल पाहण्यास मिळत आहे. उच्च शिक्षणातून यात मोठा बदल होऊ शकतो. भारती विद्यापीठ संस्था शिक्षण क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवू शकतो. भारती विद्यापीठ संस्थेने आता आपला मोर्चा विदर्भातही वळवावा. आता समृद्धी महामार्गही झाला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणbharti universityभारती विद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थी