शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारत एक मोठी उत्पादक बाजारपेठ म्हणून उदयाला येतीये - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 18:33 IST

जगाने आज आपल्याला एक मोठी संधी दिली

पुणे : जगाने आज आपल्याला एक मोठी संधी दिली. चीनकडे संशयाने पाहिले जात असताना भारत एक मोठी उत्पादक बाजारपेठ म्हणून उदयाला येत आहे. ही जी वेळ आज भारताला मिळाली आहे त्याचा आता सदुपयोग करायला पाहिजे. असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 

भारती विद्यापीठाच्या भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखु यांच्या उपस्थितीत झाले. भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्ताने पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी पवार बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह आणि प्र कुलगुरू आ. डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप ,हिमाचलचे  कॅबिनेट मंत्री संजय अवस्थी उपस्थित होते.   

फडणवीस म्हणाले, पतंगराव कदम जिंदादील होते. प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात होती. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात होती. ते आपल्यात नाहीत यावर आजही विश्वास बसत नाही.आदर पुनवाला आणि त्यांच्या टीमने जे काम केले ते त्यामुळे भारत काय आहे हे त्यांनी जगाला  दाखवून दिले. त्यांच्या या कार्याचा, सिरम इन्स्टिट्यूटचा आदर वाटतो. पतंगराव कदम यांच्या नावाने असलेला पहिला पुरस्कार आदर पुनवाला यांना दिला ते अतिशय समर्पक आहे.

भारती विद्यापीठ संस्थेने आता आपला मोर्चा विदर्भातही वळवावा

देशात आपण उच्चशिक्षणाचा मोठा विस्तार केला. अनेक खासगी संस्थानी त्यात बहुमूल्य योगदान दिले. सुरवातीला या खासगीकरणबद्दल लोकांच्या मनात शंका होती. मात्र भारती विद्यापीठ सारख्या संस्थांनी एक मिशन म्हणून हे काम हाती घेतले आणि ते पूर्णत्वास नेले. आपल्या शिक्षण क्षेत्रांत आपण ज्याप्रकारे पुढे जातो ते पाहता एक मोठा बदल पाहण्यास मिळत आहे. उच्च शिक्षणातून यात मोठा बदल होऊ शकतो. भारती विद्यापीठ संस्था शिक्षण क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवू शकतो. भारती विद्यापीठ संस्थेने आता आपला मोर्चा विदर्भातही वळवावा. आता समृद्धी महामार्गही झाला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणbharti universityभारती विद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थी