शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

भारत माणुसकीत मागासलेला : डॉ. बाबा आढाव : अग्निपुष्प पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 12:03 IST

देश मागासलेला आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली. अनुबंध प्रकाशन आयोजित व मीनाक्षी कुमकर लिखित अग्निपुष्प पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ठळक मुद्दे माणसाने आपले विचार शुद्ध करायला हवेत : बाबा आढाव आताचा भारत सत्तामेव जयते यासंकल्पेनेने चालू आहे : माधव तुटकणे

पुणे : भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या स्थानावर आहे. पण वास्तवाचा विचार केला तर माणुसकीच्या बाबत देश मागासलेला आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली. अनुबंध प्रकाशन आयोजित व मीनाक्षी कुमकर लिखित अग्निपुष्प पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल माधव तुटकणे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या मेजर जनरल माधुरी कानिटकर, अनुबंध प्रकाशनच्या अस्मिता कुलकर्णी, कर्नल अरविंद कुशवाह, लेखिका मीनाक्षी कुमकर आदी उपस्थित होते. आढाव म्हणाले, ‘‘आपल्या मानवी जीवनात माणुसकीचा विचार फारच कमी प्रमाणात केला जात आहे. माणसाने आपले विचार शुद्ध करायला हवेत. तणावातून मार्ग काढले तर मृत्यूला परत पाठवून मानवी जीवनाला जीवनदान मिळू शकते. कानिटकर म्हणाल्या, ‘‘ या पुस्तकाचे काम चालू असताना मीनाक्षी बरोबर आदिवासी भाग, गोरगरीब लोकांची ठिकाणे फिरले तेव्हाच मला माणुसकीचा खरा अर्थ कळला. प्रत्येक रुग्णाला माणूस म्हणून पाहू लागले. माधव तुटकणे म्हणाले, आपण नेहमी सत्यमेव जयते म्हणतो पण आताचा भारत सत्तामेव जयते यासंकल्पेनेने चालू आहे. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे तर छान होईल आणि हे या पुस्तकातून पाहायला मिळते.मीनाक्षी कुमकर म्हणाल्या, मी एक समाज कार्यकर्ती आहे या पुस्तकात साहित्यिक गोष्टी नाहीत तर समृद्ध वाचनाला भावणाऱ्या गोष्टी आहेत. हे पुस्तक वाचून मनुष्याला जीवनातील वेदना, व्याधी संपुष्टात आणण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावPuneपुणे