शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

राज्यात दिव्यांगाकरिता स्वतंत्र न्यायालय; ज्येष्ठ नागरिकांचे दावेही लागणार मार्गी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 06:26 IST

दोघांनाही मिळणार तात्काळ न्याय

पुणे : वर्षानुवर्षे न्यायाकरिता वाट पाहाव्या लागणा-या दिव्यांगांना आता दिलासा मिळणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पुण्यात दिव्यांगाकरिता विशेष न्यायालय सुरु करण्यात येणार आहे. अशाप्रकारचे न्यायालय सुरु करणारे पुणे हे राज्यातील पहिले न्यायालय ठरले आहे. या न्यायालयात केवळ दिव्यांगच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे दावे देखील या न्यायालयात चालविले जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांना तात्काळ न्याय मिळण्यास मदत होणार आहे.

जिल्हा न्यायालयातील जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या या न्यायालयात एच. आर वाघमारे यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील अकरा शहरात दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी विशेष न्यायालय सुरू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. दीड वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीचे न्यायालयात जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाले. या मागणीचा पाठपुरावा कल्याण येथील रहिवासी शंकर साळवे करत होते.

दीड वर्षांपूर्वी केंद्रीय न्याय विधी मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांची एक बैठक पार पडली. त्यात राज्यातील अशा प्रकारचे स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

2016 मध्ये दिव्यांगासाठीच्या कायद्यात काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. अधिसूचनेत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, लातूर, परभणी, नागपूर येथील न्यायालयात विशेष न्यायालय सुरू करण्याचे नमूद करण्यात आले होते. अधिसूचना जारी झाल्यानंतर दिव्यांग अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष न्यायालयाचे कामकाज सुरू झाले नव्हते, असे साळवे यांनी सांगितले.

सहा महिन्यांत निकालाची तरतूद

विशेष न्यायालयात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग (रॅम्प) असावा. तक्रार दाखल झाल्यानंतर सहा महिन्यात निकाल देण्यात यावा, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते. पुण्यात एकटे राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना अशा न्यायालयाचा फायदा होणार आहे.

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक समाजातील घटक आहेत. ब-याचदा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. मी आणि माझी पत्नी दिव्यांग आहे. एका प्रकरणात आम्ही अपंग कल्याण आयुक्तालयाकडे दाद मागितली होती. तेव्हा हे प्रकरण न्यायालयीन कक्षेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिव्यांगासाठी विशेष न्यायालय नसल्याची बाब माज्या निदर्शनास आली होती. त्यामुळे दिव्यांगासाठी स्वतंत्र न्यायालय राज्यात असणे गरजेचे असल्याने मी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकMantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे