शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

इंदापूर तालुक्याला मिळणार चार आवर्तने; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 13:37 IST

उन्हाळी आवर्तन बैठकीनंतर निर्णय होणार

ठळक मुद्दे१ फेब्रुवारीपासून ३० दिवसांचे आवर्तन देणारमागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे उन्हाळ्यात केवळ एकच आवर्तन

पुणे : शेटफळ मध्यम प्रकल्पातून इंदापूर तालुक्यातील काही गावांना रब्बीसाठी एक आणि उन्हाळी तीन अशी चार आवर्तने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एक फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेटफळ मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, समितीचे सदस्य सचिव विजय यादव, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, भोंडणी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शिवाजी हंगे, आरेखक पांडुरंग कटक या वेळी उपस्थित होते.शेटफळ मध्यम प्रकल्पाची क्षमती ६२० दशलक्ष घनफूट आहे. या प्रकल्पाअंतर्गत १९२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. शेटफळ, भोंडणी, बावडा, नीर-निमगाव, सराटी, लुमेवाडी, गोंडी, पिंपळी, ओझर या गावासह नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, नऊ पाणी वापर संस्थांसह सुमारे ६३ नवीन आणि जुन्या ठिंबक सिंचन योजना या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येतात. मागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे उन्हाळ्यात केवळ एकच आवर्तन दिले होते. मागील वर्षी नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात अवर्षणजन्य स्थिती होती. त्यामुळे खरीप हंगामात शेटफळ तलाव भरता आला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात देखील कमी पाणी राहिले होते. शेटफळ तलावातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापरा करावा, उपलब्ध पाणी साठ्यानुसार हंगामनिहाय पीक रचना, पीक कार्यक्रम निश्चित करण्यात यावे, लाभक्षेत्रात बारमाही पिकांसाठी सिंचन व तुषार योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात याव्या, पाण्याची गळती थांबवावी, वितरिकांची दुरुस्ती करावी, अशा सूचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. .........उन्हाळी आवर्तन बैठकीनंतर निर्णय होणारसिंचन आवर्तनाचा कालवधी ३० दिवसांचा असणार आहे. वितरिकांमधून ५० क्युसेकने पाणी सोडण्यात येईल. उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी रब्बीचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात येईल. त्यात उन्हाळी आवर्तनाचा अंतिम निर्णय होईल. 

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीagricultureशेती