शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्याला मिळणार चार आवर्तने; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 13:37 IST

उन्हाळी आवर्तन बैठकीनंतर निर्णय होणार

ठळक मुद्दे१ फेब्रुवारीपासून ३० दिवसांचे आवर्तन देणारमागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे उन्हाळ्यात केवळ एकच आवर्तन

पुणे : शेटफळ मध्यम प्रकल्पातून इंदापूर तालुक्यातील काही गावांना रब्बीसाठी एक आणि उन्हाळी तीन अशी चार आवर्तने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एक फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेटफळ मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, समितीचे सदस्य सचिव विजय यादव, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, भोंडणी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शिवाजी हंगे, आरेखक पांडुरंग कटक या वेळी उपस्थित होते.शेटफळ मध्यम प्रकल्पाची क्षमती ६२० दशलक्ष घनफूट आहे. या प्रकल्पाअंतर्गत १९२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. शेटफळ, भोंडणी, बावडा, नीर-निमगाव, सराटी, लुमेवाडी, गोंडी, पिंपळी, ओझर या गावासह नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, नऊ पाणी वापर संस्थांसह सुमारे ६३ नवीन आणि जुन्या ठिंबक सिंचन योजना या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येतात. मागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे उन्हाळ्यात केवळ एकच आवर्तन दिले होते. मागील वर्षी नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात अवर्षणजन्य स्थिती होती. त्यामुळे खरीप हंगामात शेटफळ तलाव भरता आला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात देखील कमी पाणी राहिले होते. शेटफळ तलावातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापरा करावा, उपलब्ध पाणी साठ्यानुसार हंगामनिहाय पीक रचना, पीक कार्यक्रम निश्चित करण्यात यावे, लाभक्षेत्रात बारमाही पिकांसाठी सिंचन व तुषार योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात याव्या, पाण्याची गळती थांबवावी, वितरिकांची दुरुस्ती करावी, अशा सूचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. .........उन्हाळी आवर्तन बैठकीनंतर निर्णय होणारसिंचन आवर्तनाचा कालवधी ३० दिवसांचा असणार आहे. वितरिकांमधून ५० क्युसेकने पाणी सोडण्यात येईल. उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी रब्बीचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात येईल. त्यात उन्हाळी आवर्तनाचा अंतिम निर्णय होईल. 

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीagricultureशेती