शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

२५ वर्षांपासून वीजबिलाच्या थकबाकीत अडकलेली इंदापूर नगर परिषद मुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 13:48 IST

इंदापूर नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा विभागाचे १ कोटी ७२ लाख ३५ हजार ७२२ रुपये व दिवाबत्ती विभागाचे १ कोटी ७४ लाख ६१ हजार ८८३ रुपये असे एकूण ३ कोटी ४६ लाख ९७ हजार ६०५ रुपये थकीत वीजबिल होते..

ठळक मुद्देथकीत बिल अखेर भरले : शेवटचा हप्ता ८ लाख ११ हजार रुपयांचावीजबिल भरण्यासाठी वीज पुरवठा विभागाकडे एकूण ४० हप्त्यांची केली होती मागणी

इंदापूर  :  नगर परिषदेकडे मागील २५ वर्षांपासून वीजबिल थकीत होते. त्यातील शेवटचा हप्ता ८ लाख ११ हजार रुपये वीज वितरण विभागास अदा करून सर्व थकीत वीजबिलामधून इंदापूर नगर परिषद मुक्त झाली आहे, अशी माहिती अंकिता शहा आणि मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी दिली.नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, इंदापूर नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा विभागाचे १ कोटी ७२ लाख ३५ हजार ७२२ रुपये व दिवाबत्ती विभागाचे १ कोटी ७४ लाख ६१ हजार ८८३ रुपये असे एकूण ३ कोटी ४६ लाख ९७ हजार ६०५ रुपये थकीत वीजबिल होते. गेल्या २५ वर्षांपासून हा प्रश्न निर्माण झाला होता. डिसेंबर २०१७ मध्ये नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा व पदपथावरील वीजपुरवठा बोर्डाने खंडित केला होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिकेच्या शिष्टमंडळाने ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यासोबत या विषयी मार्ग काढण्यासाठी बोलणी केली. इंदापूर नगर परिषदेने सदर थकीत वीजबिल भरण्यासाठी वीज पुरवठा विभागाकडे एकूण ४० हप्त्यांची मागणी केली होती. दरम्यानच्या काळात ऊर्जामंत्री व प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करून पंधरा समान हप्त्यांत वीजबिल भरण्याचे ठरले. नगरपालिकेने प्राधान्याने दर महिन्याला हप्तेफेड करीत वीज देयकातील शेवटची ८ लाख ११ हजार रुपये रक्कम एम.एस.ई.डी.सी.एल.ला भरून इंदापूर नगर परिषद या थकीत वीजबिलातून मुक्त झाली. कायमस्वरूपी हा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देऊन नियोजन केले. न्यायालयात याविषयी दाद मागितली. सरकारी व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला. सर्व नगरसेवक, कर्मचारी तसेच नागरिकांच्या सहकार्याने हा प्रश्न सोडवण्यास नगरपरिषदेस यश मिळाले. नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगर परिषदेस धन्यवाद दिले. हा प्रश्न सुटल्याने नगरपालिकेला आपल्या उत्पन्नाचे विकासात्मक नियोजनास संधी मिळणार आहे............मागील २५ वर्षांतील संबंधितांवर कारवाईची मागणीइंदापूर नगर परिषदेमध्ये मागील २५ वर्षांत जवळपास  ८ नगराध्यक्ष झाले असतील. नगरपालिकेमध्ये मागील २५ वर्षांत गोरगरीब जनतेकडून कराच्या रुपात जमा झालेले महसूल व शासनाकडून मिळालेल्या अनुदानाची रकमेचा विचार केला तर हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली असेल. मग त्या आठ नगराध्यक्षांनी दिवाबत्ती बिल व पाणीपुरवठा वीज बिलाचा प्रश्न का सोडवला नाही? आणि वीज वितरण कंपनीने २५ वर्षे बिल न भरता, नगरपालिकेला फुकट वीज कशी पुरवली? याबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात असून, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :Indapurइंदापूरmahavitaranमहावितरण