शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

साखर उतारा वाढला; उत्पादन ७७.६ लाख टन, मार्चअखेर चालेल हंगाम

By नितीन चौधरी | Updated: February 14, 2024 16:19 IST

राज्यात आतापर्यंत ७९० लाख टन ऊस गाळपापासून ७७.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे

पुणे : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच यंदाच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. परिणामी गाळप हंगामाच्या सुरुवातीला साखर उताऱ्यात मोठी घट दिसून आली. मात्र फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत साखर उतारा गेल्या वर्षी इतकाच अर्थात ९.८३ टक्के मिळाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ७९० लाख टन ऊस गाळपापासून ७७.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उताऱ्यात वाढ होत असल्याने कारखानदारांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदाचा गाळपहंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी राज्यात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने साखर उत्पादक जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे ऊस लागवड लांबली तर यंदाच्या पावसाळ्यात पाऊसमान कमी झाल्याने उसाच्या वाढीवरही विपरीत परिणाम झाला. याचा थेट फटका साखर उताऱ्यावर दिसून आला. यंदा १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गाळप हंगामात सुरुवातीला साखर उतारा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी होता. त्यामुळे साखर उत्पादन घटेल अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र १४ फेब्रुवारीपर्यंत राज्यात ९.८३ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी देखील ९.८३ टक्के साखर उतारा मिळाला होता. साखर उतारा वाढल्याने साखरेचे उत्पादन देखील वाढण्याची अपेक्षा साखर कारखानदारीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा राज्यात आतापर्यंत १०३ सहकारी व १०४ खासगी अशा एकूण २०७ कारखान्यांनी मिळून ७९०.६५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. यातून ७७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर चार कारखान्यांनी आपला गाळपहंगाम आटोपता घेतला आहे. यात सोलापूर विभागातील १, छत्रपती संभाजीनगर विभागातील २ व नांदेड विभागातील एका कारखान्याचे धुराडे बंद झाले आहे. गेल्या वर्षी १०६ सहकारी तर १०५ खासगी अशा २११ कारखान्यांनी मिळून ८६५.९६ लाख टन उसाचे गाळप करत ८५.१२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. तर १५ कारखान्यांनी आपला हंगाम पूर्ण केला होता.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्याने साखर हंगाम कमी काळ चालेल अशी अपेक्षा होती. ऊस उत्पादनाचा अंदाज घेता मार्च अखेरपर्यंत गाळपहंगाम सुरू राहील. - अनिल कवडे, आयुक्त, साखर

टॅग्स :PuneपुणेsugarcaneऊसGovernmentसरकारSocialसामाजिकMONEYपैसा