शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जिल्ह्यात वाढली टंचाईची दाहकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 02:43 IST

एकूण ३८ टँकरनी पाणीपुरवठा : बारामतीत १५, तर शिरूरमध्ये ११ टँकर, पुणे विभागातील १०० गावांत १०० टँकर

पुणे : दुष्काळाची दाहकता वाढू लागली असून, पुणे विभागातील १०० दुष्काळी गावांमध्ये १०० टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात सर्वाधिक ३१, तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १५ आणि शिरूरमध्ये ११ टँकर सुरू आहेत. विभागातील १ लाख ८२ हजार २६० नागरिक दुष्काळाने बाधित असून, बाधित जनावरांची संख्या १९ हजार ९०१ आहे. पुणे जिल्ह्यातील टँकरची संख्या ३० वरून ३८ झाली आहे.पुणे विभागातील सातारा, सांगली, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत चालली आहे. विभागात ६ डिसेंबर रोजी ९१ टँकर सुरू होते, तर १० डिसेंबर रोजी टँकरची संख्या १०० वर गेली. सध्या १०० गावे आणि ६७६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. साताऱ्यात ३९, पुण्यात ३८, सांगलीत १८ आणि सोलापूर जिल्ह्यात ५ टँकर सुरू आहेत.पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात माणमध्ये ३१, खटावमध्ये ५ तर कोरेगावमध्ये १ आणि फलटण येथे २ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेक गावांत तसेच वाड्यावस्त्यांत पाण्याची कायमस्वरूपी सोय नसल्याने टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात जवळपास सहा तालुक्यांतील २५ गावे आणि २७१ वाड्यावस्त्यांमधील ७२ हजार ९५९ गावांना ३८ टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता वाढली आहे.भविष्यात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जवळपास १२ गावे तसेच १३१ वाड्यावस्त्यांवर १५ टँकरनी पाणीपुरवठा सध्याच्या स्थितीत सुरू आहे. बारामातीपाठोपाठ शिरूरमध्ये सर्वाधिक ११ टँकर सुरू आहेत. शिरूर तालुक्यातील ५ गावे आणि ४६ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवले जात आहे.दौंड तालुक्यातील ७ गावे आणि ६३ वाड्यावस्त्यांसाठी ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत. तसेच, पुरंदर व जुन्नरमध्ये प्रत्येकी २ आणि आंबेगावमध्ये १ असे एकूण ३८ टँकर सुरू आहेत. सांगलीत खानापूर येथे ३, आटपाडीत ८, जतमध्ये ४, कवठे महांकाळ येथे २ आणि तासगाव येथे १ टँकर सुरू आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्यात माढा येथे ३ आणि करमाळा तालुक्यात २ टँकर सुरू आहेत.जिल्ह्यात धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे जवळपास भरली. मात्र, शेतीसाठी आवश्यक असा पाऊस न झाल्याने आजही अनेक तालुक्यांतील नद्या तसेच तलाव कोरडे पडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळाची दाहकता वाढली आहे. राज्यभरात प्रशासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. सुरुवातीला ९ टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यात वाढ झाली असून ही संख्या ३८वर पोहोचली आहे.जिल्ह्यात ७२ हजार ९५९ नागरिकांची तहान टँकरवरपुणे जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. जवळपास ६ तालुक्यांतील २५ गावे आणि २७१ वाड्यावस्त्यांवरील ७२ हजार ९५९ नागरिकांची तहान ही टँकरच्या पाण्याने भागवली जात आहे. डिसेंबर महिन्यातच ही स्थिती असल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे