शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मनुष्यबळाचा तुटवडा वाढता वाढे, अग्निशामक दल सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 02:44 IST

महापालिकेचा एक विभाग असलेल्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहने आली़ नवनवीन साधने मिळाली़ एका नवीन छोट्या केंद्राची भरही पडली असली तरी मनुष्यबळाचा तुटवडा काही केल्या कमी होताना दिसत नाही.

पुणे  - महापालिकेचा एक विभाग असलेल्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहने आली़ नवनवीन साधने मिळाली़ एका नवीन छोट्या केंद्राची भरही पडली असली तरी मनुष्यबळाचा तुटवडा काही केल्या कमी होताना दिसत नाही़ उलट सेवानिवृत्ती, वैद्यकीयदृष्ट्या अनफिट आणि खातेबदल यामुळे गेल्या वर्षी असलेल्या संख्येपेक्षा कमी संख्या बळावर अग्निशामक दल शहरातील आपत्तींमध्ये वेळेवर धावून जाऊन मदत करीत आले आहे़अत्यावश्यक सेवेकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे़ अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचाऱ्यांपैकी गेल्या वर्षी ४९० कर्मचारी होते़ गतवर्षभरात त्यात वेगवेगळ्या कारणाने घट झाली़ पण नवीन भरती न झाल्याने आता केवळ ४५० कर्मचारी उरले आहेत़ त्यांच्या भरवशावर सध्या अग्निशामक दलाकडून पुणेकरांना तत्परतेने सेवा पुरविली जात आहे़ पुणे महापालिकेच्या हद्दीत १३ अग्निशामक केंद्रे असून जनता वसाहत येथे १४ वे छोटे केंद्र सुरु करण्यात आले आहे़.समाविष्ट गावांत नाही सुविधा : केंद्र उभारण्यासाठी जागांचा प्रस्तावमहापालिकेमध्ये ११ गावांचा समावेश होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला असला, तरीही ही गावे अग्निशमन सुविधेपासून दूरच आहेत़या गावांमध्ये अग्निशमन सेवा पुरविण्यासाठी तेथे केंद्र उभारावी लागणार आहेत़ त्यासाठीअग्निशामक दलाने तसा प्रस्ताव दिला असून, जागा आरक्षित करण्यास सांगण्यात आले आहे़महापालिका प्रशासनाकडून त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशांत रणपिसे यांनी सांगितले़रॉकेट, बाण सर्वाधिक धोकादायकदिवाळीत प्रामुख्याने आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात़ अग्निशामक दलाने केलेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये आगीच्या घटनांमध्ये घट झाली आहे़ २०१६मध्ये दिवाळीत आगीच्या १७ घटना घडल्या होत्या़ तर गेल्या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन आगीच्या घटना घडल्या होत्या़ त्या दोन्ही आगी बाणामुळे लागल्या होता़ दिवाळीत उडविले जाणारे फटाकेच प्रामुख्याने आगीला कारणीभूत ठरतात़ त्यातील अनेक आगी या रॉकेट आणि पॅराशूट या फटक्यांमुळे लागल्या होत्या़ रॉकेट व्यवस्थित आकाशात न जाता ते इकडे- तिकडे जाण्यामुळे वाळलेले गवत, कचराकुंडी, झाडे पेटून आगी लागल्याचा घटना प्रामुख्याने घडतात़ त्यामुळे असे फटाका उडविताना सर्वांनी काळजी घ्यावी़दिवाळीत आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात़ त्यासाठी अग्निशामक दल नेहमीच तयारीत असते़ याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, की सर्व गाड्या पाण्याने भरून ठेवण्यात आल्या आहेत़सर्व कर्मचाºयांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, सर्व वाहने व साहित्य सुसज्ज ठेवण्यात आली आहेत़ या कर्मचाºयांसह अग्निशामक दलाकडे प्रशिक्षणासाठी विविध शहरांतील कर्मचारी येत असतात़ अशा ३० प्रशिक्षणार्थींना ३ शिफ्टमध्ये मदतीला घेण्यात येत आहे़सेफ्ट कीड्स या स्वयंसेवी संस्थेमार्फत फटाकेविरहित दिवाळी हा उपक्रम सुरू केला आहे़ शाळा, महाविद्यालयांत जाऊन संस्थेचे स्वयंसेवक जनजागृती करीत आहेत़फटाके उडविताना घ्यावयाची दक्षतालहान मुलांना एकट्याने फटाके उडवू देऊ नका़ त्यांच्यासोबत मोठ्या व्यक्तींनी राहावे़पेटते फुलबाजे शरीरापासून दूर धरावेत़ पेटते फुलबाजे वरून खाली टाकू नयेत़ तसेच खालून वर फेकू नयेत़फटाके उडविताना टेरिकॉट, नायलॉन इत्यादी कृत्रिम धाग्यांपासून बनविलेले कपडे वापरू नयेत़ तसेच फटाके कधीही खिशात ठेवू नयेत़भुईनळे हातात धरून उडवू नयेत़बाण उडविताना ते मोकळ्या जागेत, बाटलीत सरळ ठेवून उडवावेत़ हातात धरून उडवू नयेत़आकाशात उंचावर उडणारे फटाके टेरेसवर, बाल्कनीमध्ये पडून बºयाचदा आगी लागतात़ त्यामुळे दिवाळीत टेरेसवरील तसेच बाल्कनीमधील टाकाऊ तसेच अन्य वस्तू काढून टाकाव्यात़फटाक्यावर डबा किंवा अन्य वस्तू झाकून उडवू नयेत़ त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते़फटाके न फुटल्यास अशाफटाक्यांची दारू काढून ती पेटवूनये़ त्यामुळे डोळ्यांना गंभीरदुखापत होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते़फटाके उडविताना, हाताशी पाणी राहील अशी व्यवस्था करावी़ चुकून भाजल्यास भाजलेला भाग पाण्याखाली धरावा़ फुलबाजे वापरून झाल्यावर त्याची तार इतरत्र न टाकता त्वरित पाण्यात टाकावी़खिडक्या, दरवाज्यांना असलेल्या पडद्याखाली पणत्या लावू नयेत़आपत्कालीनप्रसंगी अग्निशामक दलाशी १०१ वर संपर्क साधावा़भुईचक्र व जमिनीवर फिरणारे फटाके लाथाळू नयेत़

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलPuneपुणे