शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनुष्यबळाचा तुटवडा वाढता वाढे, अग्निशामक दल सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 02:44 IST

महापालिकेचा एक विभाग असलेल्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहने आली़ नवनवीन साधने मिळाली़ एका नवीन छोट्या केंद्राची भरही पडली असली तरी मनुष्यबळाचा तुटवडा काही केल्या कमी होताना दिसत नाही.

पुणे  - महापालिकेचा एक विभाग असलेल्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहने आली़ नवनवीन साधने मिळाली़ एका नवीन छोट्या केंद्राची भरही पडली असली तरी मनुष्यबळाचा तुटवडा काही केल्या कमी होताना दिसत नाही़ उलट सेवानिवृत्ती, वैद्यकीयदृष्ट्या अनफिट आणि खातेबदल यामुळे गेल्या वर्षी असलेल्या संख्येपेक्षा कमी संख्या बळावर अग्निशामक दल शहरातील आपत्तींमध्ये वेळेवर धावून जाऊन मदत करीत आले आहे़अत्यावश्यक सेवेकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे़ अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचाऱ्यांपैकी गेल्या वर्षी ४९० कर्मचारी होते़ गतवर्षभरात त्यात वेगवेगळ्या कारणाने घट झाली़ पण नवीन भरती न झाल्याने आता केवळ ४५० कर्मचारी उरले आहेत़ त्यांच्या भरवशावर सध्या अग्निशामक दलाकडून पुणेकरांना तत्परतेने सेवा पुरविली जात आहे़ पुणे महापालिकेच्या हद्दीत १३ अग्निशामक केंद्रे असून जनता वसाहत येथे १४ वे छोटे केंद्र सुरु करण्यात आले आहे़.समाविष्ट गावांत नाही सुविधा : केंद्र उभारण्यासाठी जागांचा प्रस्तावमहापालिकेमध्ये ११ गावांचा समावेश होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला असला, तरीही ही गावे अग्निशमन सुविधेपासून दूरच आहेत़या गावांमध्ये अग्निशमन सेवा पुरविण्यासाठी तेथे केंद्र उभारावी लागणार आहेत़ त्यासाठीअग्निशामक दलाने तसा प्रस्ताव दिला असून, जागा आरक्षित करण्यास सांगण्यात आले आहे़महापालिका प्रशासनाकडून त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशांत रणपिसे यांनी सांगितले़रॉकेट, बाण सर्वाधिक धोकादायकदिवाळीत प्रामुख्याने आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात़ अग्निशामक दलाने केलेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये आगीच्या घटनांमध्ये घट झाली आहे़ २०१६मध्ये दिवाळीत आगीच्या १७ घटना घडल्या होत्या़ तर गेल्या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन आगीच्या घटना घडल्या होत्या़ त्या दोन्ही आगी बाणामुळे लागल्या होता़ दिवाळीत उडविले जाणारे फटाकेच प्रामुख्याने आगीला कारणीभूत ठरतात़ त्यातील अनेक आगी या रॉकेट आणि पॅराशूट या फटक्यांमुळे लागल्या होत्या़ रॉकेट व्यवस्थित आकाशात न जाता ते इकडे- तिकडे जाण्यामुळे वाळलेले गवत, कचराकुंडी, झाडे पेटून आगी लागल्याचा घटना प्रामुख्याने घडतात़ त्यामुळे असे फटाका उडविताना सर्वांनी काळजी घ्यावी़दिवाळीत आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात़ त्यासाठी अग्निशामक दल नेहमीच तयारीत असते़ याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, की सर्व गाड्या पाण्याने भरून ठेवण्यात आल्या आहेत़सर्व कर्मचाºयांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, सर्व वाहने व साहित्य सुसज्ज ठेवण्यात आली आहेत़ या कर्मचाºयांसह अग्निशामक दलाकडे प्रशिक्षणासाठी विविध शहरांतील कर्मचारी येत असतात़ अशा ३० प्रशिक्षणार्थींना ३ शिफ्टमध्ये मदतीला घेण्यात येत आहे़सेफ्ट कीड्स या स्वयंसेवी संस्थेमार्फत फटाकेविरहित दिवाळी हा उपक्रम सुरू केला आहे़ शाळा, महाविद्यालयांत जाऊन संस्थेचे स्वयंसेवक जनजागृती करीत आहेत़फटाके उडविताना घ्यावयाची दक्षतालहान मुलांना एकट्याने फटाके उडवू देऊ नका़ त्यांच्यासोबत मोठ्या व्यक्तींनी राहावे़पेटते फुलबाजे शरीरापासून दूर धरावेत़ पेटते फुलबाजे वरून खाली टाकू नयेत़ तसेच खालून वर फेकू नयेत़फटाके उडविताना टेरिकॉट, नायलॉन इत्यादी कृत्रिम धाग्यांपासून बनविलेले कपडे वापरू नयेत़ तसेच फटाके कधीही खिशात ठेवू नयेत़भुईनळे हातात धरून उडवू नयेत़बाण उडविताना ते मोकळ्या जागेत, बाटलीत सरळ ठेवून उडवावेत़ हातात धरून उडवू नयेत़आकाशात उंचावर उडणारे फटाके टेरेसवर, बाल्कनीमध्ये पडून बºयाचदा आगी लागतात़ त्यामुळे दिवाळीत टेरेसवरील तसेच बाल्कनीमधील टाकाऊ तसेच अन्य वस्तू काढून टाकाव्यात़फटाक्यावर डबा किंवा अन्य वस्तू झाकून उडवू नयेत़ त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते़फटाके न फुटल्यास अशाफटाक्यांची दारू काढून ती पेटवूनये़ त्यामुळे डोळ्यांना गंभीरदुखापत होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते़फटाके उडविताना, हाताशी पाणी राहील अशी व्यवस्था करावी़ चुकून भाजल्यास भाजलेला भाग पाण्याखाली धरावा़ फुलबाजे वापरून झाल्यावर त्याची तार इतरत्र न टाकता त्वरित पाण्यात टाकावी़खिडक्या, दरवाज्यांना असलेल्या पडद्याखाली पणत्या लावू नयेत़आपत्कालीनप्रसंगी अग्निशामक दलाशी १०१ वर संपर्क साधावा़भुईचक्र व जमिनीवर फिरणारे फटाके लाथाळू नयेत़

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलPuneपुणे