शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इथेनाॅलचे उत्पादन वाढवा अन्यथा तुमचे भविष्य तुमच्याबराेबर : नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 20:13 IST

आपल्याकडे झालेले साखरेचे प्रचंड उत्पादन यामुळे शेतक-यांना हवा असणारा भाव देण्यास अडचणी येतात. त्यामुळे भविष्यात कारखाने वाचवायचे असतील तर आता कारखानदारांनी उसापेक्षा इथेनॉलकडे लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

पुणे : एखाद्या उत्पादनाचे मागणीपेक्षा जास्त उत्पादन झाल्यास बाजारपेठेतील त्या उत्पादनाचा भाव कमी होतो. हा मागणी आणि उत्पादनाचा सिध्दांत साखर उद्योगाला देखील लागु होतो. आपल्याकडे झालेले साखरेचे प्रचंड उत्पादन यामुळे शेतक-यांना हवा असणारा भाव देण्यास अडचणी येतात. त्यामुळे भविष्यात कारखाने वाचवायचे असतील तर आता कारखानदारांनी उसापेक्षा इथेनॉलकडे लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे. सारखेच्या उत्पादनात भविष्य नसून इथेनॉलचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. अन्यथा तुमचे भविष्य तुमच्याबरोबर असे मार्मिक भाष्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले. दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई आयोजित साखर परिषद 20 - 20 च्या समारोपात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि च्या प्रशासकीय मंड्ळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते. 

भविष्यातील साखर उद्योगाविषयी चिंता व्यक्त करताना गडकरी म्हणाले, साखर कारखाने टिकविण्याकरिता त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या काळाची परिस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. उसाचे उत्पादन घेण्याकरिता पाण्याची नव्हे तर पाण्याच्या नियोजन आवश्यक आहे. साखर कारखानदारीच्या उद्योगात वाहतूक, मजुरांचे प्रश्न, उत्पादन खर्च याविषयक गंभीर समस्या आहेत. आपल्याला साखरेची नव्हे इथेनॉलची गरज आहे. त्यामुळे पुढील काळात त्याचे उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल. तसे झाल्यास शेतक-याचे भविष्य टिकून राहणार आहे. जितक्या प्रमाणात साखरेची निर्मिती होते तेवढी मागणी मात्र बाजारपेठेतून नसल्याने शेतक -यांची डोकेदुखी वाढली आहे. जे साखर कारखाने बंद पडले आहेत त्यांचा उपयोग इथेनॉलच्या निर्मितीकरीता करता येईल का, याचा सरकार पातळीवर विचार सुरु आहे. मात्र कारखानदारीच्या धोरणात आणखी बदल करताना त्यातील महत्वाच्या बाबी आता कारखानदारांनी लक्षात घ्याव्यात.  जे बदलतील ते टिकतील  जे केवळ उसाचे उत्पादन घेतील ईश्वर त्यांचे रक्षण करो. या शब्दांत गडकरी यांनी इथेनॉलचे महत्व पटवून दिले. 

पुढील वर्षी किमान 40 ते 45 टक्के उसाचे उत्पादन घटेल अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पाण्याचे दुर्भिक्ष्य, भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेतल्यास परिस्थिती चिंताजनक वाटते. पूर्वी साखर कारखान्यांचा हंगाम हा 130 दिवसांचा होता. गेला हंगाम 126 दिवसांवर आला. यांची सरासरी काढल्यास 77 दिवसांवर हंगाम आला आहे. राज्यात होणारे एकूण उसाचे उत्पादन आणि कारखान्याचा हंगाम हा प्रश्न पवार यांनी मांडला. तसेच कारखान्याच्या मेंटेंनन्सचा खर्च प्रचंड आहे. तो तसाच राहिल्यास कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतून घटणारी मागणी, ठरलेला भाव न देणे यासारख्या कारणांमुळे शेतक-यांच्या मनात साखर उद्योगाविषयी भीती आहे. 

ऊस नको बीट लावा..युरोपीय देशात गेलो असताना तिथे उस नव्हे बीट पासून साखर तयार करत असल्याचे पाहवयास मिळाले. बीट पाच ते सहा महिन्याचे पीक आहे. त्यातून 55 टक्के पाण्याची बचत होते. तसेच जमिनीची प्रतवारी वाढविण्याकरिता हे पीक महत्वाचे आहे. आपल्याकडे 100 टक्के बीटची लागवड होणार नाही. मात्र 4 महिने ऊस 3 महिने बीट असा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही. त्याचा परिणाम शेतक-याच्या फायद्याचा असेल. असे पवार यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीSugar factoryसाखर कारखाने