शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

इथेनाॅलचे उत्पादन वाढवा अन्यथा तुमचे भविष्य तुमच्याबराेबर : नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 20:13 IST

आपल्याकडे झालेले साखरेचे प्रचंड उत्पादन यामुळे शेतक-यांना हवा असणारा भाव देण्यास अडचणी येतात. त्यामुळे भविष्यात कारखाने वाचवायचे असतील तर आता कारखानदारांनी उसापेक्षा इथेनॉलकडे लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

पुणे : एखाद्या उत्पादनाचे मागणीपेक्षा जास्त उत्पादन झाल्यास बाजारपेठेतील त्या उत्पादनाचा भाव कमी होतो. हा मागणी आणि उत्पादनाचा सिध्दांत साखर उद्योगाला देखील लागु होतो. आपल्याकडे झालेले साखरेचे प्रचंड उत्पादन यामुळे शेतक-यांना हवा असणारा भाव देण्यास अडचणी येतात. त्यामुळे भविष्यात कारखाने वाचवायचे असतील तर आता कारखानदारांनी उसापेक्षा इथेनॉलकडे लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे. सारखेच्या उत्पादनात भविष्य नसून इथेनॉलचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. अन्यथा तुमचे भविष्य तुमच्याबरोबर असे मार्मिक भाष्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले. दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई आयोजित साखर परिषद 20 - 20 च्या समारोपात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि च्या प्रशासकीय मंड्ळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते. 

भविष्यातील साखर उद्योगाविषयी चिंता व्यक्त करताना गडकरी म्हणाले, साखर कारखाने टिकविण्याकरिता त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या काळाची परिस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. उसाचे उत्पादन घेण्याकरिता पाण्याची नव्हे तर पाण्याच्या नियोजन आवश्यक आहे. साखर कारखानदारीच्या उद्योगात वाहतूक, मजुरांचे प्रश्न, उत्पादन खर्च याविषयक गंभीर समस्या आहेत. आपल्याला साखरेची नव्हे इथेनॉलची गरज आहे. त्यामुळे पुढील काळात त्याचे उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल. तसे झाल्यास शेतक-याचे भविष्य टिकून राहणार आहे. जितक्या प्रमाणात साखरेची निर्मिती होते तेवढी मागणी मात्र बाजारपेठेतून नसल्याने शेतक -यांची डोकेदुखी वाढली आहे. जे साखर कारखाने बंद पडले आहेत त्यांचा उपयोग इथेनॉलच्या निर्मितीकरीता करता येईल का, याचा सरकार पातळीवर विचार सुरु आहे. मात्र कारखानदारीच्या धोरणात आणखी बदल करताना त्यातील महत्वाच्या बाबी आता कारखानदारांनी लक्षात घ्याव्यात.  जे बदलतील ते टिकतील  जे केवळ उसाचे उत्पादन घेतील ईश्वर त्यांचे रक्षण करो. या शब्दांत गडकरी यांनी इथेनॉलचे महत्व पटवून दिले. 

पुढील वर्षी किमान 40 ते 45 टक्के उसाचे उत्पादन घटेल अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पाण्याचे दुर्भिक्ष्य, भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेतल्यास परिस्थिती चिंताजनक वाटते. पूर्वी साखर कारखान्यांचा हंगाम हा 130 दिवसांचा होता. गेला हंगाम 126 दिवसांवर आला. यांची सरासरी काढल्यास 77 दिवसांवर हंगाम आला आहे. राज्यात होणारे एकूण उसाचे उत्पादन आणि कारखान्याचा हंगाम हा प्रश्न पवार यांनी मांडला. तसेच कारखान्याच्या मेंटेंनन्सचा खर्च प्रचंड आहे. तो तसाच राहिल्यास कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतून घटणारी मागणी, ठरलेला भाव न देणे यासारख्या कारणांमुळे शेतक-यांच्या मनात साखर उद्योगाविषयी भीती आहे. 

ऊस नको बीट लावा..युरोपीय देशात गेलो असताना तिथे उस नव्हे बीट पासून साखर तयार करत असल्याचे पाहवयास मिळाले. बीट पाच ते सहा महिन्याचे पीक आहे. त्यातून 55 टक्के पाण्याची बचत होते. तसेच जमिनीची प्रतवारी वाढविण्याकरिता हे पीक महत्वाचे आहे. आपल्याकडे 100 टक्के बीटची लागवड होणार नाही. मात्र 4 महिने ऊस 3 महिने बीट असा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही. त्याचा परिणाम शेतक-याच्या फायद्याचा असेल. असे पवार यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीSugar factoryसाखर कारखाने