शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ई-वे बिलाच्या मर्यादेत वाढ करा : राजेश शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 20:11 IST

जीएसटी कर लागू असलेल्या सर्व वस्तूंची आंतरराज्य वाहतूक करण्यासाठी ई-वे बिलाची सध्याची असलेली मर्यादा एक ते दोन लाख रुपयांपर्यंत वाढवावी.

ठळक मुद्देकेंद्र शासनाची मे २०१८ पासून संपूर्ण देशभर ई वे बिल सुरु देशात एकच कायदा असताना राज्यांमध्ये ई-वे बिलमध्ये फरक

पुणे : केंद्र शासनाने संपूर्ण देशात एकच कर प्रणाली लागू करण्यासाठी ‘जीएसटी’ आणला. परंतु ई-वे बिलमुळे मालाच्या किंमतींमध्ये मोठा फरक पडत आहे. यामुळेच महाराष्ट्र शासनाने राज्यात जीएसटी कर लागू असलेल्या सर्व वस्तूंची आंतरराज्य वाहतूक करण्यासाठी ई-वे बिलाची सध्याची असलेली मर्यादा एक ते दोन लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशनस आॅफ महाराष्ट्र (फास) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी केली.  याबाबत शहा यांनी सांगितले की, केंद्र शासनाने मे २०१८ पासून संपूर्ण देशभर ई वे बिल सुरु करण्यात आलेले आहे. त्यानुसार जी.एस.टी. कर लागू असलेला सर्व वस्तू राज्याबाहेर तसेच राज्यांतर्गत पाठवण्यासाठी ई वे बिल बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात २५ मे पासून ई-वे बिलाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली. पण काही राज्यांनी जी.एस.टी. ची बिलाची मर्यादा एक लाख रुपयेपर्यंत वाढवली आहे. जीएसटी हा संपूर्ण देशात एकच कायदा असताना देशातील वेगवेगळ्या राज्यांत मालाच्या बिलाच्या मर्यादेत तफावत दिसून येत आहे. पश्चिम बंगाल मध्ये एक लाख रुपयेपर्यतचा जीएसटीचा माल राज्यातल्या राज्यात पाठवण्याकरिता ई वे बिलाची आवश्यकता नाही. तसेच तामिळनाडूमध्ये एक लाख रुपयेपर्यंतच्या १०० वस्तूंवर उदा: कृषि अवजारे, सौर पॉवर पंप सेट, अन्न पदार्थ उत्पादने, ताजी फळे आणि भाज्या, कपडे उत्पादने, जॉब वर्क व यासंबधित सेवा वस्तूंची आंतरराज्य वाहतूक करण्यासाठी ई वे बिलातून सूट देण्यात आली आहे.      महाराष्ट्रात ही मर्यादा ५० हजार रुपये इतकी आहे. ई वे बिल जनरेट करणे ही प्रक्रिया तशी किचकट आहे. त्याकरिता कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. तरी महाराष्ट्र शासनाने जीएसटी कर लागू असलेला सर्व वस्तूंची आंतरराज्य वाहतूक करण्यासाठी ई वे बिलाची सध्याची असलेली मर्यादा एक ते दोन लाख रुपये पर्यंत वाढवावी अशी मागणी शहा यांनी केली.  

टॅग्स :PuneपुणेGSTजीएसटीCentral Governmentकेंद्र सरकारTaxकर