शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा फटका

By admin | Updated: February 28, 2015 23:19 IST

सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज पहाटे ५.४५ वा. पावसाच्या सरी पडल्या. त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यानंतर पुन्हा पावसाच्या तुरळक सरी सुरू झाल्या.

पेठ : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज पहाटे ५.४५ वा. पावसाच्या सरी पडल्या. त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यानंतर पुन्हा पावसाच्या तुरळक सरी सुरू झाल्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अचानक आलेल्या पावसाच्या सरी व दिवसभर असलेले ढगाळ वातावरण यामुळे हवामन बदलाचा शेतीपिकांवर परिणाम होणार असून, मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान होणार असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत.शेतकऱ्यांची या अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. सातगाव पठार भागातील पारगाव, पेठ, कारेगाव, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी व कुरवंडी या सर्वच गावांत पावसाच्या सरिंनी हजेरी लावली. या भागातील ज्वारी पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली असून, काढून झालेली ज्वारीची कणसे तसेच कडबा हा शेतातच होता. अचानक आलेल्या पावसाने ही ज्वारी तसेच कडबा पावसाने भिजणार आहे. शेतकऱ्यांनी या कडब्यावर तसेच कणसांवर प्लॅस्टिक कागद टाकण्यासाठी लगबग सुरू केली आहे.ज्वारी पिकांबरोबरच सध्या या गावांमध्ये उन्हाळी बाजरी काढणी चालू असून, बाजरीची कणसे शेतातचच आहेत, ती पावसाने भिजू नये, तसेच शेतात साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांदा पावसाने भिजू नये, यासाठी कणसावर तसेच कांद्यावर झाकण टाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. ज्वारीची कणसे काढून झाल्यानंतर ती उन्हात वाळवून मग त्याची मळणी केली जाते. मात्र, आता या ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे बहुतांशी शेतकऱ्यांची शेतातील ज्वारीची कणसे ही पावसाने भिजली असून, जोपर्यंत कडक ऊन पडत नाही तोपर्यंत या ज्वारीच्या कणसांची मळणी करता येणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले. एकंदरच अचानक आलेला पाऊस व ढगाळ हवामान यांमुळे शेतीपिकाच्या उत्पादनाला याचा चांगलाच फटका बसणार असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील अवकाळी फटक्यातून शेतकरी सावरला नसतानाच पुन्हा अवकाळी फेरा आला आहे. (वार्ताहर)४सासवड : गेले आठवडाभर सासवडसह पुरंदरमध्ये तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आज (दि. २८) सायंकाळी सर्वत्र अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले होते व सायंकाळी ५ च्या सुमारास पाऊस सुरू झाला. या पावसामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन किमान तापमान ११; तर कमाल तापमान २६.२ इतके नोंदण्यात आल्याचे आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या वेधशाळेचे व्यवस्थापक नितीन यादव यांनी सांगितले. ४सायंकाळी झालेला अवकाळी पाऊस २ मि.मीटर नोंदला गेल्याचे यादव यांनी सांगितले .या पावसाने रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेल्या अनेक पिकांना धोका निर्माण झाल्याने बळिराजा मात्र धास्तावला आहे. काढणीस आलेला कांदा, गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना फटका बसणार आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजीर, डाळिंब व तत्सम फळझाडांना हानी पोचणार असल्याचे माळशिरसचे शेतकरी भास्कर यादव यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. शेतकऱ्यांची धांदल४दावडी : दावडी परिसरात हलक्या सरी व ढगाळ हवामानामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शेतातील हातातोंडाशी गहू, तांदळाची पिके काढण्याची शेतकऱ्यांची धांदल उडाली.पिकांचे नुकसान४खळद : पुरंदर तालुक्यात सासवड, खळद परिसरात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वेळी या पावसाने आंब्याच्या मोहरासह अनेक पिकांना फटका बसला. याने शेतकरी हवालदील झाला आहे.४ आज सकाळपासूनच ढगाळ हवामान होते, तर हवेत प्रचंड गारवा जाणवत होता. सध्या शेतात ज्वारी, हरभरा काढणीची कामे सुरू आहेत, तर अनेकांची वैरण, ज्वारीची कणसे, काढलेला हरभरा, कापलेला गहू शेतात पडून असल्याने अचानक पाऊस आल्याने पावसाने याचे नुकसान झाले, तर या वेळी शेतकऱ्यांची प्रचंड धांदल उडाली. ४ यंदा आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहर आला असून, यालाही या अवकाळी पावसाचा फटका बसेल. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.