शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

Congress President Election: काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात पुण्याला एकदाच राष्ट्रीय अध्यक्षपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 09:50 IST

गोपाळकृष्ण गोखले होते १९०५ चे अध्यक्ष

राजू इनामदार

पुणे : अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आज दिल्लीतून निवड जाहीर होईल. काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात पुण्यात आतापर्यंत फक्त एकदाच अध्यक्षपद आले. १९०५ मध्ये पुणे हीच कर्मभूमी असलेले भारत सेवक समाजाचे संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, मात्र ते अधिवेशन बनारसला झाले. त्यानंतर १८९५ ला वार्षिक अधिवेशन पुण्यात झाले; मात्र त्याचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते.

पुण्यातील प्रयत्नांमधूनच काँग्रेसची स्थापना

पुण्यातील तत्कालीन नामवंतांच्या चर्चेतून इंग्रज अधिकारी सर ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने काँग्रेसची स्थापना झाली. सार्वजनिक काका म्हणून ओळख मिळवलेल्या गणेश वासुदेव जोशी यांनी १८७० मध्येच पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करून सनदशीर मार्गाने इंग्रज सरकारला सामाजिक, शैक्षणिक सुधारणा करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली होती. याच कामाला पुढे काँग्रेसच्या स्थापनेतून संघटनात्मक स्वरूप मिळाले व देशातील थोर व्यक्ती एकत्र येत १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.

चर्चा पुण्यात; अधिवेशन मात्र मुंबईला

विशेष म्हणजे १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. त्याचवर्षी पहिले अधिवेशन पुण्यात घ्यायचा निर्णय झाला होता. मात्र नेमकी त्याचवेळी पुण्यात त्या काळात नेहमीच येत असलेली प्लेगची साथ आली आणि हे अधिवेशन मुंबईत झाले. त्यानंतर आतापर्यंतच्या इतिहासात फक्त एकदाच म्हणजे १८९५ मध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पुण्यात आले, मात्र त्याचे अध्यक्ष पुण्याबाहेरचे होते.

लोकमान्य टिळकही नव्हते कधीच अध्यक्ष

काँग्रेसवरच नव्हे, तर देशातही बरीच वर्षे राजकीय वर्चस्व टिकवून असलेले लोकमान्य टिळकही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकले नाहीत. टिळक काळाचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांचे काँग्रेसवर वर्चस्व होतेच, पण ते कायम ठेवण्याच्या प्रयत्नात १९०७ मध्ये सुरतच्या वार्षिक अधिवेशनात गोंधळ झाला. तरीही १९१६ मध्ये लोकमान्यांच्याच पुढाकाराने लखनौ अधिवेशनात प्रसिद्ध असा हिंदू-मुस्लीम लखनौ करार झाला.

राष्ट्रीय स्तरावर कमी होत गेले पुण्याचे महत्त्व

गोखले यांचे १९१५ मध्ये निधन झाले. त्यानंतर लोकमान्यही होमरूलसारख्या चळवळीत गुंतले. त्यांच्या निधनानंतर महात्मा गांधीजी काँग्रेसचे सर्वेसर्वा झाले. त्यांना महाराष्ट्रातूनही जनाधार मिळाला, मात्र न. चिं. केळकर त्याचे नेतृत्व करत टिळक गट वेगळा झाला. तोपर्यंत महात्मा गांधीजींचे नेतृत्व देशात प्रस्थापित झाले होते. पुण्याचे महत्त्व तेव्हापासून कमी कमी होत गेले. १९३२ नंतर काँग्रेसचे वार्षिक अधिवेशनही बंद होत गेले व ते सोयीनुसार होऊ लागले.

काेण हाेते गोपाळ कृष्ण गोखले? (जन्म ९ मे १८६६, मृत्यू- १९ फेब्रुवारी १९१५)

महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू, भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक, काँग्रेसमधील मवाळ गटाचे अग्रणी, पुणे हीच त्यांनी कर्मभूमी बनवली, ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर विश्वास, सनदशीर मार्गानेच स्वराज्य मिळू शकते, याबद्दल आग्रही, प्रचंड विद्वान, अर्थशास्त्राचे अभ्यासक, अर्थशास्त्रावरची त्यांची भाषणे, मते ऐकण्यासाठी इंग्लंडच्या तत्कालीन संसदेचे सदस्य उत्सुक असत. अनेक इंग्रज आयोगांसमोर साक्षी देत भारताची स्थिती त्यांच्यासमोर आकेडवारीनिशी सिद्ध करून दाखवली.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणShashi Tharoorशशी थरूरPresidentराष्ट्राध्यक्ष