शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Friendship: पुण्यात मित्रप्रेमानं घडवली ४२ वर्गमित्रांना हवाईसफर; एक अनोखा स्नेहमेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 14:11 IST

आपल्या ४२ मित्रांना विमानाने हैद्राबादची सफर घडवून आणली

पुणे : शालेय जीवनात झालेली मैत्री अनेक वर्ष टिकवून ठेवण्यात एक वेगळाच आनंद असतो. ज्या मित्रांसोबत आपण मजा, खोडसाळपणा केला. अशा मित्रांना ३०, ३५ वर्षांनंतर भेटल्यावर शाळेतल्या त्या आठवणींना उजाळा येतो. अशाच मित्र मैत्रिणींचा स्नेहमेळावा नेहमी होत असतो. असच एक उदाहरण पुण्यात पाहायला मिळाले. देहूतील संत तुकाराम विद्यालयातील मित्र मैत्रिणी तब्बल ३३ वर्षानंतर एकत्र भेटले. १९८९ सालच्या बॅचमधली मुले नुकतीच एकत्र आली होती. त्यांच्यापैकी एका उद्योजकाने एवढ्या वर्षानंतर भेटल्याचे औचित्य साधून आपल्या ४२ मित्रांना विमानाने हैद्राबादची सफर घडवून आणली. पिंपरी चिंचवड भागातील चाकण येथे राहणाऱ्या विलास जामदार यांनी हे कौतुकास्पद कार्य केले आहे.   

 या सहलीत जीवनात प्रथमच विमान प्रवास करणारे तब्बल ३६ मुले-मुली होत्या. प्रथमच विमानात प्रवास झाल्याने त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. जामदार हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांनी जवळपास ५५० तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम केले आहे. तर कोरोना काळात गरजूंना धान्य व औषधे वाटप करण्यासह आरोग्य विषयक सेवा पुरविल्या आहेत. निराधार मुलांच्या दवाखान्याचा खर्च केला. गरजू मुलांच्या शैक्षणिक खर्चास मदत केली. आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या मुला-मुलींच्या लग्न कार्यात मदत केली आहे. तसेच, अवसरी, शिंदेगाव, वराळे, निराधार आकुर्डी, निमगाव दावडी आदी भागात गणेश मंदिरांना मदत केली आहे.

३६ जणांची पहिलीच विमानसफर

हैद्राबादची सफर झाल्यावर सर्व मित्र भावनिक झाल्याचे दिसून आले. त्यापैकी काही जण पन्नाशीच्या उंबरठयावर होते. तर काहींना आजारांनी गाठायला सुरुवातही केली होती. पण जामदार यांनी घडवून आणलेली सफर त्यांना पुनर्जीवित करणारी ठरली. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :airplaneविमानSocialसामाजिकSchoolशाळाWomenमहिला