शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पुणे विभागात पावणेसात लाख नागरिक टंचाईच्या छायेत; ३३४ गावांना टँकरचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 15:15 IST

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १५७ टँकर सुरू असून, त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात ९२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे...

पुणे :दुष्काळाच्या छायेत असलेल्या पुणे विभागात मार्चअखेर पाणीटंचाईची समस्या अधिकच बिकट होत चालल्याचे चित्र आहे. विभागात एकूण ३६४ टँकरद्वारे ३३४ गावे तसेच १ हजार ८३३ वाड्या-वस्तांना पाणीपुरवठा होत असून, तब्बल पावणेसात लाख लोकसंख्या टंचाईमुळे बाधित झाली आहे. यात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १५७ टँकर सुरू असून, त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात ९२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

अपुरा पावसाळा त्यातच परतीच्या पावसाने मारलेली दडी यामुळे यंदा पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यांत परतीच्या पावसामुळे काही प्रमाणात जलसाठ्यामध्ये वाढ होत असते. यंदा मात्र, परतीचा पाऊस न झाल्याने धरणांमधील पाणीसाठासुद्धा अपुरा आहे. त्यातच पावसाळा पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्याने विहिरींच्या पाण्यातही फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदा नोव्हेंबरपासूनच बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात टँकर सुरू झाले होते. मार्चअखेरीस ही स्थिती आणखीनच गंभीर झाली आहे.

अडीच लाख पशुधनाला टंचाईचा तडाखा

पुणे विभागात ३ एप्रिल रोजी ३६४ टँकरद्वारे ६ लाख ७२ हजार ८०७ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये ३३२ टँकर खासगी आहेत, तर ३२ टँकर शासकीय आहेत. सबंध विभागात ३३४ गावे तसेच १ हजार ८३३ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईची ही झळ अडीच लाख पशुधनाला ही बसली आहे.

सर्वाधिक टँकर साताऱ्यात

विभागात सर्वाधिक १५७ टँकर सातारा जिल्ह्यात सुरू असून, याद्वारे १५६ गावे तसेच ५६० वाड्या-वस्त्यांमधील २ लाख ६० हजार १९७ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे जिल्ह्यात ९२ टँकरद्वारे ६९ गावे व ४७७ वाड्या-वस्त्यांमधील १ लाख ३२ हजार ५०३ लोकसंख्येला पाणीपुरवठा होत आहे.

सांगली जिल्ह्यातही ७७ टँकरद्वारे ७५ गावे व ५३७ वाड्या-वस्त्यांमधील १ लाख ७५ हजार ८३४ लोकसंख्येला पाणीपुरवठा होत आहे. सोलापूर जिल्ह्यात ३८ टँकरद्वारे ३४ गावे व २५९ वाड्या-वस्त्यांमधील १ लाख ४ हजार २७३ लोकसंख्येची तहान भागवली जात आहे. सुदैवाने कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू करण्यात आलेले नाही.

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे