शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Ashadhi Wari: आम्हा ध्यास पंढरीचा अपार.. अवघड वाटही होते लीलया पार..! माऊली सासवडला मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 20:58 IST

Ashadhi Wari दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील सर्वात कठीण नागमोडी वळणाचा टप्पा पार करत माऊली संध्याकाळी सासवड मुक्कामी दाखल झाले

सासवड/गराडे: आम्हा ध्यास पंढरीचा अपार.. अवघड वाटही होते लीलया पार..! विठ्ठलाच्या नामाचा अखंड जयघोष करीत व भक्तीचे भारावलेपण घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने लाखो वैष्णवांचा साथीने ज्येष्ठ कृष्ण योगिनी एकादशी मंगळवारी दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील सर्वात कठीण नागमोडी वळणाचा टप्पा पार केला. सुमारे दोन तास घाटातील वाटचाल पूर्ण करून सोहळा संध्याकाळी सासवड मुक्कामी दाखल झाला.

डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात टाळ, मृदुंग, मुखाने ज्ञानोबा तुकाराम च्या नावाचा जयघोष करीत घाट पार करीत होते. त्यात वरुणराजाने चांगलीच भर घातली. सायंकाळी साडेचार वाजता संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे वैष्णवासमवेत दिवेघाटातून पुरंदर तालुक्यात आगमन झाले. माऊलींच्या दर्शनासाठी आसुसलेल्या लाखो भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाट आणि पुष्पवृष्टी करीत आनंद व्यक्त करीत मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

माउलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी २ वा. वडकीनाला येथे विसाव्यासाठी थांबला. यावेळी वडकी ग्रामपंचायत व अनेक सार्वजनिक मंडळांनी अन्नदान केले. त्यानंतर दुपारी ३.३० वा. सर्वात अवघड टप्पा समजल्या जाणाऱ्या दिवेघाटातील वाटेने माऊलींच्या रथाचा प्रवास सुरू झाला. रथाला पाच बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या. वातावरण ढगाळ स्वरूपाचे,जोरदार वाहता वारा व हवेत काहीसा थंडावा असल्याने उन्हाचा त्रास झाला नाही. मोठय़ा अंतराचा हा टप्पा चढताना न थकता दिंडीतील वारकरी निरनिराळी पदे, अभंग, भारुडे,गौळणी म्हणताना दिसत होते. वारकऱ्यांमध्ये एक वेगळेच चैतन्य संचारले होते. संत ज्ञानेश्वर पालखी तळावर पादुकांचे आगमन झाल्यावर सामुहिक आरती होवून दोन दिवसांच्या मुक्कामासाठी माऊलींचा सोहळा विसावला.

पालखी सोहळ्यापुर्वीच पाऊस झाल्याने बळीराजा समाधानी

दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुरंदरला आला कि, पाऊस येतो अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे सोहळ्याच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. मात्र अनेक वर्षे हि परंपरा खंडित झाली होती. पालखी सोहळा येवून अनेक वेळा कोरडाच गेल्याने यंदा काय होते ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र यंदा वेळेवर पाऊस झाला तसेच माउलीचे आज आगमन होत असतानाच सकाळी वरुणराजाने हजेरी लावली. आणि दिवसभर थोड्या फार प्रमाणात उपस्थिती दाखविल्याने पुरंदरचा शेतकरी यंदा समाधानी असल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpurपंढरपूरSocialसामाजिक