शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

फाळणीचा 'तो' इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे ऐक्यासाठी याेग्य नाही - शरद पवार

By प्रशांत बिडवे | Updated: August 20, 2023 16:24 IST

देशाची फाळणी झाल्यानंतर समाजात जी स्थिती निर्माण झाली तीही माहिती विद्यार्थ्यांना देता येईल याची काळजी घ्या असे नमूद केले आहे

पुणे: देशाची फाळणी झाल्यानंतर सामाजिक स्थितीबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे सीबीएसईने शाळांना पाठविलेल्या परिपत्रकात नमूद आहे. मात्र, फाळणीचा रक्तपाताचा इतिहास आणि कटूतेची भावना असलेला इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे हे देशाच्या सामाजिक, सांघिक ऐक्यासाठी याेग्य राहणार नाही असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्यातील शैक्षणिक संस्थेत असे काम करावे असे सीबीएसई सांगत असेल तर समाजात विसंवाद वाढेल असे काम हाेणार नाही याची शिक्षण विभागाने काळजी घेत त्यांना कळवावे असा सल्लाही त्यांनी शिक्षण मंत्र्यांना दिला.

सरहद संस्थेच्या सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी येथील नूतन इमारत आणि गाेपालकृष्ण गाेखले प्रबाेधिनीचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, संजय नहार, शैलेश पगारिया, संतसिंह माेखा आदी मान्यवर उपस्थित हाेते.

पवार म्हणाले, सीबीएसई शाळा आणि अभ्यासक्रमावर नियंत्रण ठेवणाऱ्या बाेर्डाने सर्व शाळांना पाठविलेले एक परिपत्रक माझ्या वाचनात आले. हे परिपत्रक मला चिंताजनक वाटते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही अनेक गाेष्टी संबंधीचे मार्गदर्शन करता तसे या देशाची फाळणी झाल्यानंतर समाजात जी स्थिती निर्माण झाली तीही माहिती विद्यार्थ्यांना देता येईल याची काळजी घ्या असे नमूद केले आहे. मात्र, फाळणीचा इतिहास देश विभाजनाचा इतिहास आहे. त्यावेळी रक्तपात झाला, हजाराे लाेक विस्थापित झाले. पाकिस्तानातून निघून आलेला सिंधी समाज माेठ्या संख्येने उल्हासनगर येथे राहताे. त्यांनीही त्यावेळी प्रचंड यातना सहन केल्या. पंजाब आणि त्या परिसरातील अनेक मुस्लिम लाेक पाकिस्तानात गेले. पाकिस्तानात काय झालं? या बाबत मी काही बाेलू इच्छित असल्याचे त्यांनी नमूद केले.

नव्या पिढीची वैचारिक जडण घडण महत्वाची

सार्वजनिक जीवनात नव्या पिढीने यावे असा आग्रह आम्ही करताे. मात्र, ही पिढी वैचारिकदृष्ट्या घडलेली असली पाहिजे. देशाचा इतिहास आणि समाजाचे प्रश्न माहिती असले पाहिजेत. समाजातील सर्व घटकांना एकत्रित ठेवण्याची सक्ती त्यांच्यावर निर्माण केली पाहिजे आणि ते काम गाेखले प्रबाेधिनीच्या माध्यमातून हाेईल असे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणEducationशिक्षणCBSE Examसीबीएसई परीक्षाStudentविद्यार्थी