शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फाळणीचा 'तो' इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे ऐक्यासाठी याेग्य नाही - शरद पवार

By प्रशांत बिडवे | Updated: August 20, 2023 16:24 IST

देशाची फाळणी झाल्यानंतर समाजात जी स्थिती निर्माण झाली तीही माहिती विद्यार्थ्यांना देता येईल याची काळजी घ्या असे नमूद केले आहे

पुणे: देशाची फाळणी झाल्यानंतर सामाजिक स्थितीबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे सीबीएसईने शाळांना पाठविलेल्या परिपत्रकात नमूद आहे. मात्र, फाळणीचा रक्तपाताचा इतिहास आणि कटूतेची भावना असलेला इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे हे देशाच्या सामाजिक, सांघिक ऐक्यासाठी याेग्य राहणार नाही असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्यातील शैक्षणिक संस्थेत असे काम करावे असे सीबीएसई सांगत असेल तर समाजात विसंवाद वाढेल असे काम हाेणार नाही याची शिक्षण विभागाने काळजी घेत त्यांना कळवावे असा सल्लाही त्यांनी शिक्षण मंत्र्यांना दिला.

सरहद संस्थेच्या सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी येथील नूतन इमारत आणि गाेपालकृष्ण गाेखले प्रबाेधिनीचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, संजय नहार, शैलेश पगारिया, संतसिंह माेखा आदी मान्यवर उपस्थित हाेते.

पवार म्हणाले, सीबीएसई शाळा आणि अभ्यासक्रमावर नियंत्रण ठेवणाऱ्या बाेर्डाने सर्व शाळांना पाठविलेले एक परिपत्रक माझ्या वाचनात आले. हे परिपत्रक मला चिंताजनक वाटते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही अनेक गाेष्टी संबंधीचे मार्गदर्शन करता तसे या देशाची फाळणी झाल्यानंतर समाजात जी स्थिती निर्माण झाली तीही माहिती विद्यार्थ्यांना देता येईल याची काळजी घ्या असे नमूद केले आहे. मात्र, फाळणीचा इतिहास देश विभाजनाचा इतिहास आहे. त्यावेळी रक्तपात झाला, हजाराे लाेक विस्थापित झाले. पाकिस्तानातून निघून आलेला सिंधी समाज माेठ्या संख्येने उल्हासनगर येथे राहताे. त्यांनीही त्यावेळी प्रचंड यातना सहन केल्या. पंजाब आणि त्या परिसरातील अनेक मुस्लिम लाेक पाकिस्तानात गेले. पाकिस्तानात काय झालं? या बाबत मी काही बाेलू इच्छित असल्याचे त्यांनी नमूद केले.

नव्या पिढीची वैचारिक जडण घडण महत्वाची

सार्वजनिक जीवनात नव्या पिढीने यावे असा आग्रह आम्ही करताे. मात्र, ही पिढी वैचारिकदृष्ट्या घडलेली असली पाहिजे. देशाचा इतिहास आणि समाजाचे प्रश्न माहिती असले पाहिजेत. समाजातील सर्व घटकांना एकत्रित ठेवण्याची सक्ती त्यांच्यावर निर्माण केली पाहिजे आणि ते काम गाेखले प्रबाेधिनीच्या माध्यमातून हाेईल असे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणEducationशिक्षणCBSE Examसीबीएसई परीक्षाStudentविद्यार्थी