शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, अपमानास्पद विधाने; नाकर्त्या सरकारविरोधात मुंबईत हल्लाबोल मोर्चा : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 11:07 IST

अनेक गोष्टींबाबत नाकर्त्या सरकारला त्याची जागा दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने दि.१७ डिसेंबर रोजी हल्लाबोल मोर्चा

इंदापूर : नाकर्त्या राज्य सरकारला जागा दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने येत्या १७ तारखेला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना शनिवारी (दि.१०) केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आ. अमोल मिटकरी, प्रदीप गारटकर यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, आताच्या नाकर्त्या सरकारमुळे महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर चालले आहेत. महापुरुष, महिला पदाधिकाऱ्यांबाबत अपमानास्पद विधाने करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या वाढत आहे. विकासकामे रोखली जात आहेत. रब्बी खरीप हंगाम वाया गेल्यानंतरदेखील ओला दुष्काळ जाहीर केला जात नाही. विकास होत नसल्याने सीमावर्ती भागातील गावे परराज्यातील विलीन होण्याची भाषा करीत आहेत. साखरेची निर्यात बंद करून कोटा पद्धत लादली जात आहे, अशा अनेक गोष्टींबाबत नाकर्त्या सरकारला त्याची जागा दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने दि.१७ डिसेंबर रोजी हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात विकासकामे थांबवण्याचे पाप आम्ही केले नाही. कुणा एका विशिष्ट पक्षाऐवजी महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून आम्ही कामकाज केले. पालकमंत्री असताना आम्ही निधी देण्यात कधी पक्षीय भेदभाव केला नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या समृद्धी महामार्गाच्या कामाचे पुढच्या अडीच वर्षांचे पैसे आमच्या सरकारने दिले. नितीन गडकरी यांनी सुरू केलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. यंदा उसाचे टनेज २० टनाने घटले आहे. यंदा साखर कारखाने मार्चलाच बंद होतील. साखरेची निर्यात बंद करून कोटा पद्धत सौरू करण्यात आली आहे. परदेशात साखरेला क्विंटलला चार हजार रुपये दर मिळतो आहे. इकडे ३३०० रुपये आहे. क्विंटलला शेतकऱ्याला सातशे रुपये मिळाले तर यांचे काय जाते असा सवाल पवार यांनी केला.

कोण भिकेला लागतो हे चंद्रकांत पाटलांना दाखवून द्या

महापुरुषांनी भीक मागून शिक्षण संस्था काढल्या असे म्हणतात. आम्ही जर काय भिकारड्यासारखे बोलता असे म्हटले तर काय वाटेल तुम्हाला, असा सवाल उपस्थित करीत, अरे ला का रे आम्हालाही करता येते. ‘भ’ची भाषा तर लई चांगली जमते; पण तशी आमची संस्कृती नाही, वडीलधाऱ्यांचे संस्कार नाहीत, असा टोला मारून यांना आत्ता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. साऱ्या महापुरुषांची आठवण ठेवून, कोण भिकेला लागतो हे चंद्रकांत पाटलांना दाखवून द्या, असे आवाहन पवार यांनी उपस्थितांना केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र