शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

"विकास करूनही वेगळा निर्णय घेणार असाल तर, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा"; अजित पवार थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 15:34 IST

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दोऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका मेळाव्याला संबोधित केले.

Ajit Pawar ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज बारामती दोऱ्यावर आहेत, आज त्यांनी एका मेळाव्याला संबोधित केले.  यावेळी अजित पवार यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य केले. " एवढी विकासकामे करुनही जर बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील तर बारामतीलाही वेगळा आमदार मिळाला पाहिजे,यानंतर माझ्या आमदारकीच्या कार्यकाळातील आणि नव्या व्यक्तीच्या कामाची तुलना करावी',असं विधान अजित पवार यांनी केले. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. 

धनंजय मुंडेंनी भेट का घेतली? बैठकीत काय घडलं? मनोज जरांगे पाटलांनी सगळंच सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य केले आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून येगेंद्र पवार यांनी उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रचारातही लोकसभेला जिंकून दिले तरच विधानसभेला उभं राहणार असे जाहीर सांगितले होते. दरम्यान, आज बारामती येथे जाहीर मेळाव्यात केलेल्या या जाहीर विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. 

'बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला पाहिजे'

बारामती येथील एका मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले,मी पण शेवटी माणूस आहे. मला पण कधी कधी विचार येतो की, एवढी सगळी कामे करुन बारामतीकर वेगळा पण निर्णय घेऊ शकतात. तर मग आपण पण आता ३३, ३४ वर्षे झाली. मी तर आता दुसऱ्यांना खासदार करु शकतो, राज्यसभा दुसऱ्याला दिली. त्याआधी सुनेत्रा पवार यांना दिली. आमदारही दुसऱ्याला केले. पण आता अशीच गंमत होणार असेल तर आता झाकली मूठ सव्वा लाखाची. आता आपणही समाधानी आहे. जिथं पिकतं, तिथं विकत नसतं. एकदा बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही माझी १९९१ ते २०२४ ची तुलना करा, असंही अजित पवार म्हणाले.

"न सांगता रस्ता होतो. न सांगता पाण्याच्या योजना सुरू होतात. आता कुठल्याही भागात गेला तर रस्ता नाही असं नाही. मेडिकल कॉलेज न मागता मिळतंय.तुम्ही काम लगेच विसरुनच जाता. विकासकामे केली की लगेच काहीजण दुसऱ्या बाजूला टपऱ्या टाकतात, असं काही करु नका. सकाळपासून उठून कामे करावी लागतात पण काही जण आमची चेष्टा करतात, त्याच्याबद्दल म्हणने काही नाही, जे आहे ते आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवार