शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

वीज हवी असेल तर मारावे लागणार रिचार्ज- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 2:59 PM

उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

बारामती: मोबाईल रिचार्ज प्रणालीप्रमाणे विजेसाठीसुद्धा प्रीपेड कार्ड पद्धत सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. जेवढ्या पैशांचा रिचार्ज केला जाईल, तेवढीच वीज संबंधितांना वापरता येईल. तुम्हाला चांगल्या प्रकारची सेवा हवी असेल तर आपल्याला नवीन टेक्नाॅलॉजी वापरावी लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोऱ्हाळे (ता. बारामती) येथील एका कार्यक्रमात रविवारी (दि. १७) ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, जो वीज बिल नियमितपणे भरतो, त्याला फटका बसणार नाही. जे वीज बिल भरत नाहीत, त्यांचा भार वीज बिल भरणाऱ्यांवर बसतो. अलीकडे विजेची चणचण भासायला लागली आहे. देशात व राज्यात देखील कोळशाची कमतरता आहे. त्यासाठी आम्ही परदेशातून कोळसा आयात करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, आपल्या पॉवर प्लांटमध्ये १०० टक्के परदेशी कोळसा चालत नाही. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विजेची मागणी ३ ते ४ हजार मेगावॅटने वाढली आहे. बाहेरच्या राज्यांकडून देखील वीज खरेदीचा निर्णय झाला आहे. कोयना प्रकल्पातून विजेसाठी पाणी देण्याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी पाणी शिल्लक ठेवून उर्वरित पाण्याचे नियोजन वीजनिर्मितीसाठी केले आहे. भर दुपारी अनेक ठिकाणी वीज सुरू असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. आता जिल्हा परिषदेकडून मिळणारे हायमास्ट दिवे आम्ही बंद केले आहेत. मात्र, हे हायमास्ट दिवे वेळेत बंद होत नाहीत. त्याचा मोठा फटका राज्याला बसत आहे, असेही यावेळी पवार म्हणाले.

बारामतीमध्ये टायगर व लायन सफारी...

बारामती तालुक्यातील गाडीखेल परिसरामध्ये बिबट्या सफारीबाबत चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा मागे पडल्यानंतर त्याच परिसरात टायगर व लायन सफारी करण्याचा मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील कार्यक्रमांमध्ये व्यक्त केला. येथील जागा निश्चित झाली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. त्यामुळे बारामती येथे मयूरेश्वर अभयारण्य, चिंकारा पार्क, शिवसृष्टी याबरोबरच टायगर वन लायन सफारीमुळे येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे.

धर्म, जातीमध्ये तेड करणाऱ्याच्या नादाला लागू नका

सध्या राज्यात व देशामध्ये काही जणांकडून धर्मा-धर्मांमध्ये जातीजातींमध्ये तेड निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. कृपया कोणीही अशा मंडळींच्या नादाला लागू नका. जातीय तणाव निर्माण झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचा खरा फटका गरिबाला बसतो. दिवसभर काम केल्यावर ज्याच्या घरातील चूल पेटते, अशा लोकांच्यावर त्याचा परिणाम होतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडelectricityवीज