शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहराच्या पूरस्थितीचा पिच्चर अभी बाकी है

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 21:26 IST

पुण्यात निर्माण झालेली आपत्कालिन परिस्थीती ही मानवनिर्मित व मानवदुर्लक्षित असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी व्यक्त केले.

पुणे : शहरामध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेली आपतकालीन परिस्थिती व आलेला पूर हा केवळ ट्रेलर आहे. शहराली ओढे-नाल्यावर झालेली प्रचंड अतिक्रमणे, शहरालगतच्या डोंगर, टेक्यांवरील वृक्षतोड, बेसुमार केलेले उत्खनन यामुळे डोंगर उतारावरून पावसाचे पाणी प्रचंड वेगाने वाहून येत असून, अतिक्रमाणामुळे ओढ्याची वहन क्षमता प्रचंड कमी झाली आहे. यामुळे भविष्यात प्रचंड भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी लोकमतशी बोलताना दिला.

शहरामध्ये प्रामुख्याने दक्षिण पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी आंबील ओढ्याला पूर आल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली. शहराच्या इतर भागात देखील अनेक ओढ्या नाल्यांना आलेल्या पूरामुळे हजारो नागरिक बांधित झाले असून, काहींना आापला जीव गमवावा लागला. अनेर जनावरे वाहून गेली. सार्वजनिक व खाजगी संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत पर्यावरण तज्ज्ञ यादवाडकर यांनी लोकमतला वस्तुस्थितीची माहिती दिली. याबाबत त्यांनी सांगितले की, शहरामध्ये बुधवारी रात्री निर्माण झालेली आपतकालीन परिस्थिती मानव निर्मिती व मानव दुर्लक्षित आहे. शहरामध्ये मुळा-मुठा नदीला एकूण ५५ लहान-मोठे ओढे नाले मिळतात. परंतु यापैकी २०-२५ टक्के ओढे सुद्धा अस्तित्वात राहिलेले नाही. यामध्ये अनेक ओढे  प्रशासन व बिल्डरांनी संगनमताने बुजविण्यात आले आहेत. यामुळे थोडा पाऊस झाला तरी शहराच्या रस्त्यांना ओढे नाल्याचे स्वरुप येते.

नागरिक, बिल्डर यांच्या सोबतच प्रशासनाने देखील शहरातील ओढे-नाले, नद्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रण केले आहे. प्रशासनाने ओढ्यामध्ये पाणी, ड्रेनेज लाईन टाकल्या असून, यासाठी मोठ-मोठे कलवड देखील बांधले आहेत. अनेक भागामध्ये संरक्षण भित्तीच्या नावाखाली ओढ्या-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाहच बंद केला आहे. यामुळेच भविष्यात शहरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

आंबील ओढ्याची विर्सग क्षमता २४ हजार क्युसेक्सशहरामध्ये पूरस्थिती निर्माण झालेल्या आंबील ओढ्याची मुठा नदीतील विर्सग क्षमता तब्बल २४ हजार क्सुसेक ऐवढी प्रचंड आहे. यामुळे खरे तर या आंबील ओढ्याला छोटी नदी म्हणूनच गृहत धरणे अपेक्षित होते. कात्रज येथे उगम असलेल्या या आंबील ओढ्याला कात्रज डोंगरातून देखील एक ओढा येऊन मिळतो. परंतु प्रशासनाने याला ओढा जाहीर करून यावरील अतिक्रमणे करण्यासाठी वाटच निर्माण करुन दिली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत या ओढ्याचे अनेक भागात अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. आंबील ओढ्याची विर्सग क्षमत लक्षात घेता नदी म्हणून घोषित करुन, ब्ल्यू लाईन, रेड लाईन निश्चित करण्याची गरज होती. परंतु प्रशासनाकडून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जाते.

 ‘मेरी’ कडून २०१० मध्ये दिला होता इशाराकेंद्र शासनाने सर्व राज्यांना आपल्या राज्यातील क्लायमेट चेंज संदर्भांत काय परिस्थिती निर्माण होऊ शकते या संदर्भातील सविस्तर अहवाल करण्याचे आदेश २००९ मध्ये दिले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने तातडीने महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) संस्थेला या संदर्भांत अहवाल देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मेरी संस्थेने राज्यातील प्रत्येक विभागाचा क्लायमेट चेंज संदर्भांत अत्यंत सविस्तर अहवाल शासनाला सन २०१० मध्ये सादर केला आहे. यामध्ये पुणे विभागामध्ये येत्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण तब्बल ३७.५ टक्क्यांनी वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण वाढणार असले तरी दिवस मात्र कमी होणार आहे. यामुळे अत्यंत कमी दिवसांत खूप जास्त म्हणजे ढगफुटी सारखा पाऊस पडेल असे स्पष्ट केले आहे. परंतु या अहवालाकडे राज्य शासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरण