शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
5
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
6
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
7
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
8
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
9
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
10
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
11
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
12
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
13
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
14
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
15
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
16
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
17
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
18
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
19
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
20
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...

पुणे शहराच्या पूरस्थितीचा पिच्चर अभी बाकी है

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 21:26 IST

पुण्यात निर्माण झालेली आपत्कालिन परिस्थीती ही मानवनिर्मित व मानवदुर्लक्षित असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी व्यक्त केले.

पुणे : शहरामध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेली आपतकालीन परिस्थिती व आलेला पूर हा केवळ ट्रेलर आहे. शहराली ओढे-नाल्यावर झालेली प्रचंड अतिक्रमणे, शहरालगतच्या डोंगर, टेक्यांवरील वृक्षतोड, बेसुमार केलेले उत्खनन यामुळे डोंगर उतारावरून पावसाचे पाणी प्रचंड वेगाने वाहून येत असून, अतिक्रमाणामुळे ओढ्याची वहन क्षमता प्रचंड कमी झाली आहे. यामुळे भविष्यात प्रचंड भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी लोकमतशी बोलताना दिला.

शहरामध्ये प्रामुख्याने दक्षिण पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी आंबील ओढ्याला पूर आल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली. शहराच्या इतर भागात देखील अनेक ओढ्या नाल्यांना आलेल्या पूरामुळे हजारो नागरिक बांधित झाले असून, काहींना आापला जीव गमवावा लागला. अनेर जनावरे वाहून गेली. सार्वजनिक व खाजगी संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत पर्यावरण तज्ज्ञ यादवाडकर यांनी लोकमतला वस्तुस्थितीची माहिती दिली. याबाबत त्यांनी सांगितले की, शहरामध्ये बुधवारी रात्री निर्माण झालेली आपतकालीन परिस्थिती मानव निर्मिती व मानव दुर्लक्षित आहे. शहरामध्ये मुळा-मुठा नदीला एकूण ५५ लहान-मोठे ओढे नाले मिळतात. परंतु यापैकी २०-२५ टक्के ओढे सुद्धा अस्तित्वात राहिलेले नाही. यामध्ये अनेक ओढे  प्रशासन व बिल्डरांनी संगनमताने बुजविण्यात आले आहेत. यामुळे थोडा पाऊस झाला तरी शहराच्या रस्त्यांना ओढे नाल्याचे स्वरुप येते.

नागरिक, बिल्डर यांच्या सोबतच प्रशासनाने देखील शहरातील ओढे-नाले, नद्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रण केले आहे. प्रशासनाने ओढ्यामध्ये पाणी, ड्रेनेज लाईन टाकल्या असून, यासाठी मोठ-मोठे कलवड देखील बांधले आहेत. अनेक भागामध्ये संरक्षण भित्तीच्या नावाखाली ओढ्या-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाहच बंद केला आहे. यामुळेच भविष्यात शहरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

आंबील ओढ्याची विर्सग क्षमता २४ हजार क्युसेक्सशहरामध्ये पूरस्थिती निर्माण झालेल्या आंबील ओढ्याची मुठा नदीतील विर्सग क्षमता तब्बल २४ हजार क्सुसेक ऐवढी प्रचंड आहे. यामुळे खरे तर या आंबील ओढ्याला छोटी नदी म्हणूनच गृहत धरणे अपेक्षित होते. कात्रज येथे उगम असलेल्या या आंबील ओढ्याला कात्रज डोंगरातून देखील एक ओढा येऊन मिळतो. परंतु प्रशासनाने याला ओढा जाहीर करून यावरील अतिक्रमणे करण्यासाठी वाटच निर्माण करुन दिली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत या ओढ्याचे अनेक भागात अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. आंबील ओढ्याची विर्सग क्षमत लक्षात घेता नदी म्हणून घोषित करुन, ब्ल्यू लाईन, रेड लाईन निश्चित करण्याची गरज होती. परंतु प्रशासनाकडून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जाते.

 ‘मेरी’ कडून २०१० मध्ये दिला होता इशाराकेंद्र शासनाने सर्व राज्यांना आपल्या राज्यातील क्लायमेट चेंज संदर्भांत काय परिस्थिती निर्माण होऊ शकते या संदर्भातील सविस्तर अहवाल करण्याचे आदेश २००९ मध्ये दिले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने तातडीने महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) संस्थेला या संदर्भांत अहवाल देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मेरी संस्थेने राज्यातील प्रत्येक विभागाचा क्लायमेट चेंज संदर्भांत अत्यंत सविस्तर अहवाल शासनाला सन २०१० मध्ये सादर केला आहे. यामध्ये पुणे विभागामध्ये येत्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण तब्बल ३७.५ टक्क्यांनी वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण वाढणार असले तरी दिवस मात्र कमी होणार आहे. यामुळे अत्यंत कमी दिवसांत खूप जास्त म्हणजे ढगफुटी सारखा पाऊस पडेल असे स्पष्ट केले आहे. परंतु या अहवालाकडे राज्य शासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरण