शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही : अ‍ॅड प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 7:35 PM

घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही, त्यामुळे घराणेशाही, मक्तेदारीला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले.

पुणे : घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही, त्यामुळे घराणेशाहीला, मक्तेदारीला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले. पुणे लाेकसभेचे वंचितचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ एसएसपीएमएसच्या मैदानावर आंबेडकरांची सभा झाली त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून पवारांवर नाव न घेता जाेरदार टीका केली. 

आंबेडकर म्हणाले, एका नेत्याने माढातून माघार घेतली तर नातवाला मावळमधून उमेदवारी दिली. त्या नातवाचे गुण सांगितले तर आजाेबांना धक्का बसेल त्यांना काही झाले तर दाेष माझ्यावर यायचा. इंदू मिल येथील स्मारकाच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात माेदी मला म्हंटले तुम्ही मला भेटत नाहीत. तेव्हा मी म्हंटलं कामाशिवाय मी काेणाला भेटत नाही. परंतु मला माेदींना सांगायचंय की मी त्यांना आता 23 मे नंतरच भेटणार आहे. गुजरातमधील राखीव संसाधन म्हणून ठेवण्यात आलेला मीठाचा डाेंगर माेदींनी एका व्यवसायिकाला विकल्याचा आराेपही आंबेडकरांनी यावेळी माेदींवर केला. माेदी देशातील संपत्ती कवडीमाेलाने विकत असल्याचेही ते म्हणाले. 

आपल्या भाषणात आंबेडकरांनी काॅंग्रेसवर देखील टीकेची झाेड उठवली. काॅंग्रेसच्या खादीमध्ये खाकी शिरत असल्याचे ते म्हणाले. काॅंग्रेसला पुण्यात उमेदवार सापडत नव्हता, परंतु त्यांनी आमच्याशी बाेलणी केली नाही. यंदाच्या निवडणुकीत काॅंग्रेस तिसऱ्या स्थानावर असल्याने आमची लढत थेट भाजपाशी आहे. मिलिंद एकबाेटे आणि संभाजी भिडे यांना तुरुंगात टाकण्यासाठी आपण सत्तेत आलं पाहिजे असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpune-pcपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी